शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१३

हो ची मिन्ह भाग ३


                   फ़ारच थोद्या अवधीत तो परत व्हीअतनामला येउन क्रान्तिकारी सन्घटना बान्धु लागला. हो हा स्वत: जरी कम्यनिस्ट असला तरी त्याने आपल्या विचारसरनीमुऴे व्हिअतनामच्या राश्त्रहिताला बाधा येउ दिली नाही.दुसर्या महायुद्धाच्या कालात व्हिअतनामन्मध्ये ’तान-व्हिअत-काच-मोन्ग दोन्ग’ म्हनजे ’नव्या व्हिअतनामचा क्रान्तिकारी पक्श’ हा राश्त्रवादी पक्श होता. चीनप्रमाने जेव्हा व्हिअतनाम मध्ये राश्त्रवादी() आनी कम्युनिस्टान्मध्ये सन्घर्श होन्याची चिन्हे दिसु लागताच त्याने व्हिअतनामच्या स्वातन्त्र्यासाथी लडत असनार्या सर्व पक्शान्चे एकत्रीकरन ’इन्दोचायना कम्युनिस्ट’ हा पक्श स्थापन केला.
                    इतक्यात मोस्कोला जात असताना होन्ग कोन्ग मध्ये हो ला ब्रिटीशान्नी जेरबन्द केले. पन हो च्या इन्ग्रज मित्रानी अतिशय चलाखिने हो चा म्रुत्यु ज़ाल्याची अफ़वा उटविली आनि त्याला सहिसलामत मोस्कोला पाथवुन दिले.तेव्हापासुन दुसरे महयुद्ध सुरु होन्याच्या सन्धीची वाट पहात तो शांतपने बसुन होता.१९३८ ला दुसरे महायुद्ध सुरु होताच हो वेश बदलुन येनान या चीनी कम्युनिस्ट राज्यात आला. तेथे त्याने माओची भेट घेतला याच भेटीत दोघान्ची मैत्री जाली.हो चीनमधे असतानाच तीथे जनरल जिअप आनि दोन्ग हे दोन व्हिअतनामी नेते होते.त्यान्ची भेट होवुन स्वातन्त्रयुद्धाची पुडील दिशा टरवित असताना व्हिअतनामच्या द्रुश्तिने एक आंनददायी घटना युरोपात घडली ती म्हनजे जर्मनीकडून फ़्रान्सचा पराभव. फ़्रान्स मध्ये अस्थिरता निर्मान ज़ाल्यामुऴे त्याचा वसाहतीवरील पकड सैल ज़ाली.यामुऴे या सर्व क्रान्तिकारकान्नी मायदेशी परतायचा निर्नय घेतला.पन मायदेशातही परिस्तिथी बिकट ज़ाली होती कारन व्हिअतनाम वर आत पुर्वेकडून जपानने आक्रमन करायला सुरुवात केली होती.   
 
                      आधीच पराभुत असलेल्या फ़्रेन्च सरकारला कधी गोडी गुलाबीने तर कधी धमकावुन व्हिअतनामचा ताबा जपानने सहज घेतला कारन युरोपियन भुमीवर गऴ्यापर्यन्त अडकलेल्या फ़्रान्स आनि ब्रिटन ला आशियाइ भुमिवर युद्ध नको होते म्हनुन त्यानी जास्त प्रतिकार न करता व्हिअतनाम जपानच्या ताब्यात दीला. व्हिअतनाममध्ये सैन्य जपानचे आनि मुलकी कारभार फ़्रेन्चाकडे  अशी स्थिती होती. फ़्रेन्चान्चा पराभव होतोय हे पाहुन व्हिअतनामी जनतेला आनन्दच होत होता पन हो ला माहीत होते की जपान आनी फ़्रान्स दोघेही साम्राज्यवादी आहेत दोघांनाहि व्हिअतनामच्या सुख दुख:शी काहीही देने घेने नाही त्याने सर्व स्वातन्त्रसैनिकान्ची आघाडी निर्मान केली.आनि एक काऴजीवाहु सरकार निर्मान केले.आनि व्हिअतनामच्या जनतेने सशस्त्र लडा देन्यासाटी तयार रहावे असे आवाहन केले. 
                      नशीबानेही मग हो ला चान्गलीच साथ दिली कारन ९ मार्च १९४५ च्या पहाटे जपान्यानी व्हिअतनाममधिल सर्व फ़्रेन्च अधिकार्याना तुरुन्गात टाकले.यामुऴे व्हिअतनामी क्रान्तिकारकाना अटकाव करायला कोनीच उरले नाही.फ़्रेन्च तुरुन्गात होते आनि जपान्यां सर्व लक्श चीनच्या युद्धावर होते.त्यामुऴे व्हिअतनामी क्रान्तिकारकांना तयारीसाथी भरपुर वेऴ मिऴाला. सर्व सैन्य तयार ज़ाल्यावर जनरल जिअपने जपान विरुद्ध युद्ध सुरु करन्याचे थरविले पन हो ने त्याला अडवीले कारन युरोपात जर्मनीची शरनागती सुरु ज़ाली होती आनी जपानीही काही दीवसात माघार घेतील हे त्याला कऴुन चुकले होते.म्हनुनच जपान माघार घेताच फ़्रान्सशीच अन्तिम लडा द्यावा लागेल हे त्याने ओऴखले आनि आपल्या अनुयायाना सबुरीचा सल्ला दीला.
५ ओगस्त १९४५ ला जपानवर अनुबोम्ब पदताच हो ज्या क्शनाची वात पाहत होता तो क्शन उगविला.जपानने व्हिअतनाममधुन अचानकपने माघार घेतली.

हो चि मिन्ह :भाग 2


  व्हिअतनामवरुन निघालेले हे जहाज भुमध्य समुद्रामार्गे फ़्रान्सच्या मार्सेल्स बन्दरात पोचले.आपले शोशन करनारे,आपल्यावर अन्याय करनारे फ़्रेन्च याच देशातुन येतात काय असा सन्शय येन्याइतपत व्हिअतनाममधिल फ़्रेन्च सरकारी अधिकारी आनि फ़्रेन्च सामान्य मानुस यान्च्यात फ़रक होता.त्यामुऴे सर्व  फ़्रेन्चान्चा द्वेश करने योग्य होनार नाही हा विचार हो च्या मनात रुजला.या जहाजावरील नोकरीत त्याने अमेरिकेलाही भेट दीली. पन जेव्हा पहिल्या महायुद्धाला गेला.पन लंडनमध्ये आपन काही्ही केले तरी त्याचा परीनाम व्हिअतनामच्या स्वातन्त्रयुद्धावर होनार नाही हे कऴुन चुकल्यामुऴे तो पहील्या महायुध्दाच्या अखेरीस परत फ़्रान्स ला आला.
 पहील्या महायुध्दा सुरुवात होत होती तेव्हा व्हिअतनामच्या स्वातन्त्र्यासाथी काहीतरी करन्यासाथी त्याने जहाजावरील नोकरी सोदली आनि तो फ़्रान्सला आला.त्यावेऴी फ़्रान्स सम्पतोय कि काय अशी परीस्थिती निर्मान होत होती.त्यामुऴे तिथे राहने धोक्याचे समजुन तो लंडनला गेला.पन लंडनमध्ये आपन काही्ही केले तरी त्याचा परीनाम व्हिअतनामच्या स्वातन्त्रयुद्धावर होनार नाही हे कऴुन चुकल्यामुऴे तो पहील्या महायुध्दाच्या अखेरीस परत फ़्रान्स ला आला. हो परीसला पोचताच रशियामधे लेनिनने क्रान्ति केली आनि लोकप्रतिनिधीन्चे हन्गामी सरकार स्थापन केले.
        याच काऴात हो वर कम्युनिस्ट विचारान्चा प्रभाव पडला.यानन्तर १९२२ पर्यन्त हो फ़्रान्स मधे सनदशीर मार्गाने लडा देत गेला.या काऴात पत्रके काडने,वसहतीमधील परिस्थीतीवर लेख लिहिने,फ़्रेन्च नेत्याना भेटने या गोश्टी त्याने केल्या. पन या सगऴयचा काहीच उपयोग होत नाही हे समजल्यावर तो सरऴ कम्युनिस्टच्या जागतिक मुख्यालयात म्हनजे मोस्कोला रशियात आला.फ़्रान्स मध्ये सनदशीर मार्गाने लडा दिला असल्याने त्याला मोस्को दरबारी फ़ारच महत्व प्राप्त होते.म्हनुन जेव्हा चीनमध्ये कम्युनिस्ट कार्यकर्त्यान्चे पथक पाटवीले गेले त्यात हो ची वर्नी लागली.
चीनमध्ये पोचताच त्याने थान निआन ह्या व्हिअतनामी क्रन्तिकारक सन्घटनेच्या मदतीने व्हिअतनाममध्ये चीनच्या सीमेवरुन शस्त्रास्ते पाटविली.त्याने अनेक क्रन्तिकारकना प्रशिक्शन देउन व्हिअतनाममध्ये पाटविले.पन त्याचा दुर्दैवाने चान्ग कै शैक च्या चीनी राश्त्रवादी गटाने चीनमध्ये कम्यनिस्ट गटाच्या कत्तली करायला सुरुवात केली.त्यामुऴे हो 1928 ला होन्ग कोन्ग मार्गे रशीयाला परतला.

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१३

हो ची मिन्ह भाग १







लेनिन,माओ,मार्क्स यान्चे घराने सान्गनारा हा अजुन एक कम्युनिस्ट योद्धा.व्हिअतनामचा राश्त्रपिता म्हनुन आजही हो चि मिन्ह ची ख्याति आहे.हो चा म्रुत्यु ज़ाल्यानन्तर सायगाव या दक्शिन व्हिअतनामच्या राजधानिचे नाव बदलुन हो चि मिन्ह असे करन्यात आले.व्हिअतनामच्या जनतेवर पुत्रवत प्रेम करनारया या नेत्याला व्हिअतनामची जनता ’हो काका’ म्हनुन हाक मारत असे.हो ने व्हिअतनामच्या स्वातन्त्र्यासाटि आधी जपान मग फ़्रान्स आनी मग त्यानन्तर मग अमेरिका या सर्व बलाध्य शत्रुन्शी लडा द्यावा लागला.पन व्हिअतनामचे दुर्दैव असे की त्याचे सर्व शत्रु शक्तीशाली होते. व्हिअतनामचा प्रश्न फ़ारच अवघड होता.
      व्हिअतनाम आधी फ़्रान्सच्या पारतन्त्रच्या जोखडखाली १८८४ पासुन वावरत होता,दुसर्या महायुद्धामध्ये जपानचा पराभव ज़ाला आनि  फ़्रान्सकडुन जपानने व्हिअतनाम परत घेतला.  दुसर्या महायुद्धानन्तर जपानकडुन परत फ़्रान्सने परत दक्शिन  व्हिअतनामचा ताबा घेतला. पन तोपर्यन्त उत्तर व्हिअतनामवर व्हिअतनामी कम्युनिस्तानी आपला कब्जा केला होता .चीनच्या साह्ह्याने हो ने उत्तर व्हिअतनाम स्वतन्त्र केला. हो च्या नेत्रुत्वाखालील "व्हिअत-मिन्ह" या सन्घतनेने सशस्त्र लडा देवुन फ़्रान्सचा पुरता बिमोड केला आनि फ़्रान्सला दक्शिन व्हिअतनाम सोडून जायला भाग पाडले.पन यावेऴी काहिहि सम्बन्ध नसताना,चोम्बडेपना करन्याची सवय असलेली अमेरिका या युद्धात उतरली आनि सुटत आलेला व्हिअतनामचा प्रश्न अधिकच जटील बनला.जगात कुटेही कम्युनिस्ट राज्य अस्तित्वात येत असेल तर कोनत्याही परिस्थितीत त्याला विरोध करने हाच अमेरिकेचा अजेन्डा होता.रशियाचा प्रभाव रोखन्यासाथी अमेरिका त्याकाऴी कोनत्याही थराला जात होती.त्यामुऴे अमेरिकेविरुद्ध व्हिअतनामला १९७४ पर्यन्त लडावे लागले.
        नान दान या प्रान्तातील किम लिन या गावी १९ मे १८९० ला हो चा जन्म ज़ाला.त्याला ’नग्युअन तात थान’ हे नाव देन्यात आले.पन इतिहासात हो च्या या नावाचा उल्लेख फ़ारच कमी वेऴा आडतो. हो चे बाबा एक हुशार शिक्शक होते. पन एका फ़्रेन्च अधिकार्याने आकसापोटी त्याना नोकरीतुन खालसा केले आनि त्यामुले ते आपल्या परीवारास हुए इथे सोदुन परगन्दा झाले. हो चे लहानपन गावात उनाडपना करन्यात गेले.त्याच्या लहानपनी व्हिअतनाम मध्ये फ़्रेन्च सत्ताधार्यान्विरोधात लहान सहान लडाया होत असत पन फ़्रेन्च अधिकारी या स्वातन्त्र सैनिकांना निर्दय पने चिरडत असत. चार इयत्ता फ़्रेन्च शालेत घालवुन हो ने ”फ़ान थिअत" या बन्दराकडे पलायन केले. तिथे फ़्रेन्च भाशा शिकविन्याचे काम केले.आनि मग या कामाचाही कन्टाऴा येउन सप्तेंबर १९११ ला तो सायगाव ला आला.आनि जग फ़िरन्याच्या इच्चेने त्याने सायगाव मधील नाविक प्रशिक्शन केन्द्रात नाव नोन्दविले.एका फ़्रेन्च जहाजाच्या भटारखान्यात नोकरी मिऴविली.इथे त्याने नाव सान्गितले "बा".

मंगळवार, १६ एप्रिल, २०१३

निरोप समारंभ

      परवा आमचा निरोप समारंभ होता . "First Batch of SETI" आमच्या नावाला हे बिरुद गेले चार वर्षे चिकटून होत. तसे आम्ही पहिले असल्याने आम्ही सार्या कोलेजचे प्रचंड लाडके होतो. 
         आमचे चेअरमन भोसले सरांच्या मनात  आमच्यासाठी एक सोफ्ट कॉर्नर होता . पन्हाल्यासारख्या ठिकाणी कॉलेज असल्यामुळे येथे फारच मजा यायची . 

      इथिल सर्व शिक्षकांनी आमच्यावर खरच खूप प्रेम केलं, आम्हाला प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन केलं आम्हाला संकटांना तोंड द्यायला शिकविल . थरकार सर  ,देशमुख सर ,कोळी सर  ,नांगरे सर  ,कुलकर्णी सर ,मोहिते ,देसाई सर या आणि अशा कित्येक शिक्षकांनी आमच्या पाठीशी उभे राहून आम्हाला साथ दिली . त्यांचे  मानावे तितके थोडेच आहेत . 

      चार वर्ष कशी सरली हे अजूनही कळत नाही . अजूनही वाटतय कि फार कमी वेळ मिळाला या कॉलेजमध्ये . चार वर्षात खर तर फार आठवणी जमा झाल्यात काही चांगल्या काही वाईट . चांगल्या आठवणी आज ओठावर हसू आणतायत तर वाईट आठवणी अजूनही सलातायत . पण as usual वाईट आठवणी इथेच सोडून चांगल्या आठवणींची शिदोरी घेऊन आता पुढे जायला हव.  

     निरोप समारभानंतर कित्येकांच्या डोळ्यात पाणी आलं होत.मित्रांना सोडून जाण्याच्या कल्पनेनच गलबलून येतय. चार वर्षांचा सहवास ऋणानुबंध सार काही सोडून आता पुढ जायचं आहे.  हे सर्व करताना खरतर जीवावर येतंय पण काय करणार we must move on.

     इथून गेल्यावर या सगळ्यांची फार आठवण येईल . आता इथून पुढे आयुष्यात नवे मित्र नक्की मिळतील पण संजीवांमधील मित्रांची बातच काही और आहे. 

                     या सर्वांची खूप आठवण येईल . 

गुरुवार, २१ मार्च, २०१३

चे गव्हेरा



चे  गव्हेराचा फोटो लाखो टी शर्ट वर पाहिलय ,पण चे  गव्हेरा कोण हे किती जणांना माहित आहे?
          
              


                   चे  गव्हेराचा हा फोटो जगातील सगळ्यात प्रसिध्द फोटो आहे,चे  गव्हेरा पेक्षा त्याचा फोटोच प्रसिध्द आहे.  ज़नरलि हे उलट असत. डॉक्टर गव्हेरा  हा मार्क्सवादी क्रांतिकारक, लेखक, गनिमी लढवय्यांचा म्होरक्या, राजकीय नेता आणि लष्कर तज्ञ होता.पेशाने डॉक्टर असला तरी गनिमी काव्याच्या लढाईत त्याच्यासारखा कसलेला योद्धा विसाव्या शतकात तरी शोधून सापडणार नाही.अर्जेन्तिनाचा नागरिक असला तरी त्याने दक्षिण अमेरिकेतील कित्येक देशांमध्ये सशस्त्र लढा दिला . 
               परवा मी लायब्ररीतून एक बुक काढलं The motorcycle diaries तेव्हा मला समजल कि चे गव्हेरा या डॉक्टरच एका क्रांतिकारक महानायाकात रुपांतर कस झालं.चेला डीग्री मिळाल्यानंतर त्याने संपूर्ण दक्षिण अमेरिका खंडाला मोटार सायकलीवरून वळसा घालण्याचा बेत आखला . त्याच्या या मोहिमेत त्याचा मित्र अल्बारतो हा त्याच्या साथीला होता .चे ने १९५२  आणि ५३ साली चिली,कोलंबिया,पेरू,पनामा,क्युबा  या देशांना भेटी  दिल्या. या भेटीमध्ये त्याने दक्षीण  अमेरिकेतील दारिद्र्य,गरिबी,दु:ख यांचा सामना केला . आणि या देशांतील नागरिकांच्या दुरवस्थेला अमेरिकाचा कारणीभूत आहे असं त्याच ठाम मत बनलं .याच भटकंती मध्ये  ''दक्षिण  अमेरिकेला एकाच पूर्वजांचा वारसा मिळाला आहे आणि दक्षिणेकडील लोकांनी एकत्र आले पाहिजे'' अशी चे ने मत बनविले .पुढे  क्युबा आणि बोलिव्हिया मध्ये लढताना त्याने हाच विचार डोळ्यासमोर ठेवला होता .
             दक्षिण अमेरिका फिरून झाल्यावर चे ने मेक्सिकोमध्ये एका इस्पितळात नोकरी पकडली.चे गव्हेरा मेक्सिकोमध्ये असताना त्याची भेट फिडेल कअस्ट्रो शी झाली त्यावेळी त्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि मग पुढे बतीश्ता सरकारच्या विरोधात चे फिडेल च्या मदतीला धावला होता .   पण मनातील उर्मी स्वस्थ बसू देत नसल्यामुळे त्यानंतर बतीश्ता सरकारच्या विरोधात सशस्त्र लढा देण्यासाठी  चे ने फिडेल आणि राउल च्या मदतीसाठी क्युबामध्ये जायचं ठरवील,यासाठी एका छोट्या जहाजातून आपल्या ८२  क्रांतिकारक सैन्यासह तो क्युबाच्या किनारपट्टीवर उतरला . पण बतिष्टच्या सैन्याने हल्ला केल्यामुळे त्याचे अनेक साथीदार मारले गेले.  जीव वाचविण्यासाठी आणि प्रतिहल्ला करण्यासाठी चे ने तिथल्या पर्वत रांगात आश्रय घेतला . तिथे त्यांना स्थानिक लोकची मदत मिळाली.यानंतर मग चे,फिडेल आणि राउल कस्ट्रो यांनी क्युबाचा तो प्रसिध्द "२६ जुलैचा उठाव " केला . या उठावामध्ये आपल्या मुठभर सैन्याच्या मदतीने बतीस्त च्या हजारोंच्या सैन्याचा पराभव केला आणि बतीश्ता ला क्युबा सोडून पळून  जाण्यास भाग पाडले .  क्युबामधील उठावानंतर चे ने क्युबाच्या पुनर्बांधणीमध्ये मोलाची कामगिरी बजावली . त्याला क्युबाच्या राष्ट्रीय बँकेचे गव्हर्नर पद देण्यात आले.
                क्युबाच्या पुनर्बांधणीसाठी त्याने रशियाकडून मदत घेतली .त्याने या काळात भारत,जर्मनी,इजिप्त अशा अनेक देशांना भेटी दिल्या .  क्युबा स्थिर झाल्यानंतर त्याने क्युबाच्या राजकारणातून अंग काढून घेतले. पण त्याच्यातील  क्रांतिकारक त्याला शांत बसू देत नव्हता . त्याने मग कोंगो या आफ्रिकन देशातील क्रांतीत सहभाग घेतला . त्याला अन्यायाविरुध्ध लढा देण्यासाठी कोणत्याही देशाच्या सीमा मंजूरच नव्हत्या . कोंगो मध्ये त्याने आपल्या गनिमी काव्याच्या तंत्राचे प्रशिक्षण आफ्रिकन लोकांना दिले. याही ठिकाणी त्याच्या युद्धतंत्राने कोंगो सरकारला मात दिली.
 
                कोन्गोमधील मिशन संपल्यावर  चे गव्हेरा आता बोलीवियाच्या क्रांतीत सहभागी झाला .   सुरुवातीच्या काळात गव्हेराच्या मोजक्या सैन्याने बोलीवियाच्या प्रशिक्षित सैन्याचा छोट्या चकमकीत सपशेल पराभव केला . पण नंतर अमेरिकन सरकारने बोलिविया सरकारला प्रशिक्षित कमांडो पुरवायला सुरुवात केली .त्याचबरोबर गाव्हेराच्या सैन्याचा क्युबाशी असलेला रेडियो संपर्क तुटला या सर्व अडचणींमुळे गव्हेरा आणि त्याचे क्रांतेकारी एकटे पडले . पण गव्हेरा अजून बोलीवियामाध्येच टिकून होता पण अचानक एका रात्री बोलिव्हियाच्या आर्मीने गाव्हेराच्या तळावर हल्ला केला . गव्हेराच्या  सर्व साथीदाराना अमानुषपने मारून टाकण्यात आले आणि जबर जखमी  असलेल्या गाव्हेराला पकडण्यात आले आणि दुसर्या दिवशी त्याचा खून करण्यात आला . त्याचे शेवटचे शब्द होते ,''मला माहित आहे तुम्ही मला मारायला आलात,पण तुम्ही मला मारलं पण क्रांती अमर राहील "

गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१३

गुपित



आठवते मज 
भेट आपुली 
शब्दात बांधली 
शपथ आर्त ती 
वचनामध्ये 
बांधुनी मज 
निरोप होता 
तो भयंकर 

शपथ पाळ 
मज सांगून गेली 
शपथ पाळणे
तिला न जमले 
शपथ  अशी 
मोडुनी तरी  
माझ्यावरती 
राग तिचा 

मला कळेना 
शपथ घालूनी 
शपथ तोडणे 
डाव मांडुनी 
डाव उधळणे 
जमले 
कसे हिस 
असे वागणे 

क्षणभून्गुरता 
शब्दांची मग 
समजून आली 
मला अवेळी 
तळपणाऱ्या 
या सुर्याखाली 
शपथेला त्या 
किमंत नव्हती 

गुपित आपुले 
तू जरी फोडिले 
मज हृदयात 
सांभाळीन मी 
या प्राणांच्या 
मोलाहुनी 
                           -निखिल 

मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१३

बुद्धिबळ


                    परवा संजीवनमध्ये(माझं  कॉलेज ) बुद्धिबळाच्या स्पर्धा होत्या.सहज टाईमपास म्हणून या टेबलावरून त्या टेबलावर बुद्धिबळाच्या पतांचे निरीक्षण करीत हिंडत होतो.असाच फार वेळ हिंडल्यावर एका टेबलावर नजर स्थिरावली,आणि जरा विचार केल्यावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली कि  बुद्धिबळात आणि आपली नॉर्मल आयुष्यात फार साम्य आहे.  बुद्धिबळात सोंगट्याच्या चाली वेगवेगळ्या असतात आणि त्याच प्रमाणे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या स्वभावात देखील आपल्याला फरक दिसून येत असतो.प्रत्येक सोंगटीच्या चालीबरोबर मला आजूबाजूला आढळणाऱ्या व्यक्तिरेखांशी आढळणार साम्य दिसून आलं.आणि जेव्हा मी या सगळ्या सोंगट्याचा अभ्यास केला तेव्हा मला हे कळून चुकल कि  बुद्धिबळ या खेळाची रचना हि आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहे.मला जे समजल ते मी पुढे मांडत आहे,

प्यादा :-
            प्यादा हा बुद्धिबळातील सगळ्यात साधा घटक.जगाप्रमाणे बुद्धिबळातही यांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे आणि यांच्याकडे कोणतेही विशेष कसब नसते,यांची झेप आणि चाल देखील छोटी असते पण तरीही ते महत्वाचे असतात.कोणत्याही कंपनीचा पाया जसा त्यांची work force असतो,तसा हा बुद्धिबळाचा पाया असतो. याना काही जास्त महत्व दिल जात नाही,उलट जेव्हा महत्वाच्या सोन्गटीला वाचावयाच असतं तेव्हा यांचा सोयीस्कररीत्या बळी दिला जातो कारण त्यांच्या नसण्याने कुणाचेही काही अडत नाही.यांना नेहमी पुढे उभं केलं जात(का ते माहित नाही कदाचित प्रहार झेलण्यासाठी ). 
    पण जेव्हा यातलाच एक प्यादा संपूर्ण पट पार करून पलीकडे पोहोचतो तेव्हा त्याचा वजीर होतो.that means खऱ्या आयुष्यातदेखील प्रत्येक प्याद्याला संधी असते,तोही वजीर बनू शकतो पण त्यासाठी त्याला परिस्थितीचा पट पार करण्यासाठी झगडाव लागतं .

हत्ती :-
     प्रचंड ताकद आणि सरळमार्ग,असं "rare combination". आपली प्रचंड ताकद वापरताना सरळ आणि नैतीकतेने वापरण्याची अक्कल यांच्याकडे असते.हे लोकच बुद्धिबळ आणि समाजाचे खरे बल असतात.

घोडा :-
     यांची चाल समाजाने  थोडे अवघड असते.यांच्यात झेप घेण्याची कुवत असते.शत्रूसाठी यांचा धोका ओळखण फार अवघड असत कारण म्हणजे इतर कुणाकडेही नसलेली चाल यांच्याकडे असते आणि ते अडथल्यापलीकडेही पाहू शकतात यामुळे यांच्या पंखाखाली फार मोठा प्रदेश असतो. 

उंट :-
     तिरकी चाल.तिरक्या चालीच्या उंटाबद्दल मी वेगळ काय सांगणार कारण आपल्यापैकी प्रत्येकजण कधीना कधीतरी या अशा लोन्कांकडून भाजलेला असतो.तरीही असे लोक समाजात असतात आणि त्यांना समाजात  स्थान देखील असते.

वजीर :-
      बुद्धिबळाच्या पटावरचा " सर्वशक्तीशाली योद्धा ".यांच्या भात्यात अनेक शस्त्रे असतात, यांच्या चाली अनेक असतात.शत्रूसाठी सर्वात धोकादायक म्हणून याचं नाव असत.हा जेव्हा पटावर असतो तेव्हा बाजी जिंकण्याच्या आशा असतात आणि जेव्हा तो नसतो तेव्हा साऱ्या आशा मावळतात.हा नेहमी फ्रेममध्ये असतो.साऱ्यांच लक्ष याच्याकडेच लागून राहिलेले असते.हा त्या पटाचा खरा नेता/लीडर असतो.

राजा :-
      राजा हा top ला असतो.तास पाहिलं तर हे देखील एक प्यादाच असतं यांच्यात कोणताही विशेष गुण किंवा कसब नसतो  .पण सत्ता,अधिकार आणि पैसा या गोष्टी  त्याला उच्च  बहाल करतात. बुद्धिबळात आणि माझ्या मते समाजातही  लोक  उपयूक्त ठरत नाहीत उलट त्यांना वाचविण्यासाठी,त्याचं रक्षण करण्यासाठीच इतरांची शक्ती आणि वेळ खर्च होत असतो. 


                माझ्यामते ज्याने कुणी  बुद्धिबळ हा खेळ बनविला त्याने तो बनविताना तत्कालीन समाजातील या गोष्टी नक्कीच लक्षात घेऊन या महान खेळाची रचना केली असेल .

बुधवार, ३० जानेवारी, २०१३

स्वार्थत्याग


 "स्वार्थत्याग" हा गुण महान राष्ट्राच्या नागरिकाच्या अंगी असावा लागतो.

          कधीतरी मी स्वत:ला हा प्रश्न विचारतो कि भारतीय नागरिकांच्या अंगी हा गुण आहे काफार काथ्याकुट केल्यावर मला उत्तर मिळते "नाही",आजूबाजूला पाहिलं तर माझ्या या वाक्यातील सत्यांश आपल्या ध्यानी  येईल.भ्रष्टाचाराविरुद्ध कितीही बोंबाबोंब केली तरी सिग्नलवर १०० रुपयांचा दंड भरण्या ऐवजी  आपण पोलिसाला "साहेब ५० मध्ये अडजस्ट करा कि " म्हणून खुली ऑफर देतोआपण ५० रुपयांच्या फायद्यासाठी व्यवस्था भ्रष्ट करतो मग खरच आपणास भ्रष्टाचाराविरुद्ध बोलण्याचा अधिकार पोचतो का?
          आपल्या इथे एखादा गरीब आणि स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार निवडणूक जिंकल्याची उदाहरणे किती आहेत? अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच उदाहरणे सापडतील.आज जे देशात माजलय त्यानंतरही कॉंग्रेस परत जिंकून येऊ शकते याच  कारण  मते देताना आपण आपली तत्वे,विचार आणि सारासार विचारशक्ती बासनात बांधून ठेवलेली असते.आणि एकदा का मतदान करून बाहेर पडलो कि मग  मोठमोठी तत्वज्ञान सुचू लागतात,

      “देवा पांडुरंगा या देशाला वाचीव बाबा” 

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
HTML Comment Box is loading comments...