शुक्रवार, १३ जुलै, २०१२

शेवटच्या वर्षी

                                                        आज परत एक लेक्चर झाल,विषय काय नेहमीचाच ,''शेवटच्या वर्षाला आहात ,करियरची काही तरी काळजी करा नाहीतर आयुष्याची वाट लागेल ''.हे वाक्य शंभरदा एकूण डोके  फिरायची वेळ आली होती  .नाही तसं पाहिलं तर  हा विषय फार गंभीर आहे हे मान्य ,पण कितीवेळा ऐकायचं  हे ?म्हणून ऐकूनही या कानातून एकूण त्या कानातून दरवेळी सोडली.
                                                      एखादी गोष्ट चार वेळा जरी सांगितली तरी कळते आम्हाला पण इथे तर जो तो येतो  आणि टपली मारून जातोय.जणू काही आमच्या  भवितव्याची आम्हाला काही काळजीच नाही.मला हे म्हणायचं नाही कि कुणी आम्हाला काही सांगूच नका ,पण माझं म्हनन एवढच  आहे कि जरा  आमच्पण म्हनन ऐका,खरच आम्ही आमच्या करियरबद्दल सेरियस  नव्हतो ?आज आम्हाला इंजिनियर म्हणजे  काय हे  कळायच्या आधी आम्हाला  इंजिनियरिंगच्य अडमिशानाचे फॉर्म भरावे लागतात,आणि  कसातरी सर्व आणि प्रक्रिया पार करून कोलेजच्या आवारात पोचतो न पोचतो तोच मार्कांच्या रेस मध्ये ओढले जातो,पाच तास कोलेज,दोन तास क्लास,तीन तास सबमिशन,तासभर प्रवास यात दिवस आणि  प्रक्टीकॅल्स,टेस्ट,परीक्षा यात एकामागून एक वर्ष मुठीतल्या वाळूप्रमाणे संपून जातात आणि मग कधी करू करियरचा विचार?.बर आजकाल इथे फक्त मार्क असून भागात नाही, soft स्किल पण पाहिजेत,त्यासाठी इतर activities करा. पण या rat race मधून  वेळ कुणाला आहे.चार वर्ष राबा आणि बाहेर आल्यावर आम्हाला काही किंमतच नाही. 




                                                        थकवलय पार या इंजिनियरिंग.आता शेवटच्या  वर्षी अडमिशनच्या  वेळेची स्वप्न आता बासनात गुंडाललीत,सबमिशसाठी जगलेल्या रात्री निरर्थक वाटतायत.आता जगाच्या नकाशात स्वताच स्थान शोधायचं आहे ,स्वत:च्या हिमतीवर ...............................                
                
                

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
HTML Comment Box is loading comments...