गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१३

गुपित



आठवते मज 
भेट आपुली 
शब्दात बांधली 
शपथ आर्त ती 
वचनामध्ये 
बांधुनी मज 
निरोप होता 
तो भयंकर 

शपथ पाळ 
मज सांगून गेली 
शपथ पाळणे
तिला न जमले 
शपथ  अशी 
मोडुनी तरी  
माझ्यावरती 
राग तिचा 

मला कळेना 
शपथ घालूनी 
शपथ तोडणे 
डाव मांडुनी 
डाव उधळणे 
जमले 
कसे हिस 
असे वागणे 

क्षणभून्गुरता 
शब्दांची मग 
समजून आली 
मला अवेळी 
तळपणाऱ्या 
या सुर्याखाली 
शपथेला त्या 
किमंत नव्हती 

गुपित आपुले 
तू जरी फोडिले 
मज हृदयात 
सांभाळीन मी 
या प्राणांच्या 
मोलाहुनी 
                           -निखिल 

मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१३

बुद्धिबळ


                    परवा संजीवनमध्ये(माझं  कॉलेज ) बुद्धिबळाच्या स्पर्धा होत्या.सहज टाईमपास म्हणून या टेबलावरून त्या टेबलावर बुद्धिबळाच्या पतांचे निरीक्षण करीत हिंडत होतो.असाच फार वेळ हिंडल्यावर एका टेबलावर नजर स्थिरावली,आणि जरा विचार केल्यावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली कि  बुद्धिबळात आणि आपली नॉर्मल आयुष्यात फार साम्य आहे.  बुद्धिबळात सोंगट्याच्या चाली वेगवेगळ्या असतात आणि त्याच प्रमाणे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या स्वभावात देखील आपल्याला फरक दिसून येत असतो.प्रत्येक सोंगटीच्या चालीबरोबर मला आजूबाजूला आढळणाऱ्या व्यक्तिरेखांशी आढळणार साम्य दिसून आलं.आणि जेव्हा मी या सगळ्या सोंगट्याचा अभ्यास केला तेव्हा मला हे कळून चुकल कि  बुद्धिबळ या खेळाची रचना हि आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहे.मला जे समजल ते मी पुढे मांडत आहे,

प्यादा :-
            प्यादा हा बुद्धिबळातील सगळ्यात साधा घटक.जगाप्रमाणे बुद्धिबळातही यांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे आणि यांच्याकडे कोणतेही विशेष कसब नसते,यांची झेप आणि चाल देखील छोटी असते पण तरीही ते महत्वाचे असतात.कोणत्याही कंपनीचा पाया जसा त्यांची work force असतो,तसा हा बुद्धिबळाचा पाया असतो. याना काही जास्त महत्व दिल जात नाही,उलट जेव्हा महत्वाच्या सोन्गटीला वाचावयाच असतं तेव्हा यांचा सोयीस्कररीत्या बळी दिला जातो कारण त्यांच्या नसण्याने कुणाचेही काही अडत नाही.यांना नेहमी पुढे उभं केलं जात(का ते माहित नाही कदाचित प्रहार झेलण्यासाठी ). 
    पण जेव्हा यातलाच एक प्यादा संपूर्ण पट पार करून पलीकडे पोहोचतो तेव्हा त्याचा वजीर होतो.that means खऱ्या आयुष्यातदेखील प्रत्येक प्याद्याला संधी असते,तोही वजीर बनू शकतो पण त्यासाठी त्याला परिस्थितीचा पट पार करण्यासाठी झगडाव लागतं .

हत्ती :-
     प्रचंड ताकद आणि सरळमार्ग,असं "rare combination". आपली प्रचंड ताकद वापरताना सरळ आणि नैतीकतेने वापरण्याची अक्कल यांच्याकडे असते.हे लोकच बुद्धिबळ आणि समाजाचे खरे बल असतात.

घोडा :-
     यांची चाल समाजाने  थोडे अवघड असते.यांच्यात झेप घेण्याची कुवत असते.शत्रूसाठी यांचा धोका ओळखण फार अवघड असत कारण म्हणजे इतर कुणाकडेही नसलेली चाल यांच्याकडे असते आणि ते अडथल्यापलीकडेही पाहू शकतात यामुळे यांच्या पंखाखाली फार मोठा प्रदेश असतो. 

उंट :-
     तिरकी चाल.तिरक्या चालीच्या उंटाबद्दल मी वेगळ काय सांगणार कारण आपल्यापैकी प्रत्येकजण कधीना कधीतरी या अशा लोन्कांकडून भाजलेला असतो.तरीही असे लोक समाजात असतात आणि त्यांना समाजात  स्थान देखील असते.

वजीर :-
      बुद्धिबळाच्या पटावरचा " सर्वशक्तीशाली योद्धा ".यांच्या भात्यात अनेक शस्त्रे असतात, यांच्या चाली अनेक असतात.शत्रूसाठी सर्वात धोकादायक म्हणून याचं नाव असत.हा जेव्हा पटावर असतो तेव्हा बाजी जिंकण्याच्या आशा असतात आणि जेव्हा तो नसतो तेव्हा साऱ्या आशा मावळतात.हा नेहमी फ्रेममध्ये असतो.साऱ्यांच लक्ष याच्याकडेच लागून राहिलेले असते.हा त्या पटाचा खरा नेता/लीडर असतो.

राजा :-
      राजा हा top ला असतो.तास पाहिलं तर हे देखील एक प्यादाच असतं यांच्यात कोणताही विशेष गुण किंवा कसब नसतो  .पण सत्ता,अधिकार आणि पैसा या गोष्टी  त्याला उच्च  बहाल करतात. बुद्धिबळात आणि माझ्या मते समाजातही  लोक  उपयूक्त ठरत नाहीत उलट त्यांना वाचविण्यासाठी,त्याचं रक्षण करण्यासाठीच इतरांची शक्ती आणि वेळ खर्च होत असतो. 


                माझ्यामते ज्याने कुणी  बुद्धिबळ हा खेळ बनविला त्याने तो बनविताना तत्कालीन समाजातील या गोष्टी नक्कीच लक्षात घेऊन या महान खेळाची रचना केली असेल .

बुधवार, ३० जानेवारी, २०१३

स्वार्थत्याग


 "स्वार्थत्याग" हा गुण महान राष्ट्राच्या नागरिकाच्या अंगी असावा लागतो.

          कधीतरी मी स्वत:ला हा प्रश्न विचारतो कि भारतीय नागरिकांच्या अंगी हा गुण आहे काफार काथ्याकुट केल्यावर मला उत्तर मिळते "नाही",आजूबाजूला पाहिलं तर माझ्या या वाक्यातील सत्यांश आपल्या ध्यानी  येईल.भ्रष्टाचाराविरुद्ध कितीही बोंबाबोंब केली तरी सिग्नलवर १०० रुपयांचा दंड भरण्या ऐवजी  आपण पोलिसाला "साहेब ५० मध्ये अडजस्ट करा कि " म्हणून खुली ऑफर देतोआपण ५० रुपयांच्या फायद्यासाठी व्यवस्था भ्रष्ट करतो मग खरच आपणास भ्रष्टाचाराविरुद्ध बोलण्याचा अधिकार पोचतो का?
          आपल्या इथे एखादा गरीब आणि स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार निवडणूक जिंकल्याची उदाहरणे किती आहेत? अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच उदाहरणे सापडतील.आज जे देशात माजलय त्यानंतरही कॉंग्रेस परत जिंकून येऊ शकते याच  कारण  मते देताना आपण आपली तत्वे,विचार आणि सारासार विचारशक्ती बासनात बांधून ठेवलेली असते.आणि एकदा का मतदान करून बाहेर पडलो कि मग  मोठमोठी तत्वज्ञान सुचू लागतात,

      “देवा पांडुरंगा या देशाला वाचीव बाबा” 

शुक्रवार, ११ जानेवारी, २०१३

क्रांती


                         विस्टन चर्चिल एकदा म्हणाले होते कि "युद्ध फार वाईट असते पण राष्ट्राची मानहानी त्यापेक्षा कितीतरी वाईट असते".भारताच्या दोन निधड्या छातीच्या जवानांची निघृण हत्या होते आणि आपले सरकार त्याचा फक्त निषेध नोंदविते.अशावेळी स्वतंत्र भारताच्या नागरिकांच्या स्वाभिमानाला तडा जातोय हि गोष्ट आपल्या सरकारच्या ध्यानी का येत नाही ? आजकालच्या घटनाकडे पाहिलं तर भारताच्या श्यामळू  कुणाचाच विश्वास राहिला नाही .भारतीय तरुणांना नव्या तगड्या नेतृत्वाची गरज भासत आहे.भारतातील हे नवीन नेतृत्व भारतीय तरूणांच खर नेतृत्व असावं अशी आम्हा तरुणांची अपेक्षा  आहे.राजकीय  पक्ष,त्यांची सत्तापिपासू वृत्ती,   फायदा बघून बदलणारी तत्वे या सर्वांपासून सुटका होण्याची वाट भारतीय तरुण बघत आहे. 
                       भारतातील हि अराजकाची स्थिती पाहून मला एका नाझी जनरलने सांगितलेले वाक्य आठवतेय,"जेव्हा व्यवस्था ढासळू लागेल,जेव्हा सत्ताधारी लोक स्वार्थासाठी राष्ट्राला दावाणीस बांधतील,लोकांचा धर्म,राष्ट्र आणि तत्वान्वरचा विश्वास ढळू लागेल तेव्हा याला विरोध करण्यासाठीविरोध करण्यासाठी जनतेतून एक नेता समोर येईल आणि तो सत्ता हातात घेईल आणि यासाठी जरी त्याला रक्तामासाचा चिखल तुडवावा लागला तरी तो डगमगणार नाही "
                        सरकारने स्वत:ला आणि देशाला पण सावरावे नाहीतर..... हो क्रांती होणारच .पण त्यासाठी रक्तामासाचा चिखल तुडवावा लागू नये एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना.

रविवार, ३० डिसेंबर, २०१२

वर्षाखेर


                                          "अलविदा २०१२" 

                     आणखी एक वर्ष सरलं .२०१२ संपल पण जग काही बदल नाही यातच सगळा आनंद आहे.कारण या वर्षातील महागाई ,बलात्कार,अपघात या सर्वांचा जो महापूर आला होता तो पाहून जग नक्की बुडणार अशी धास्ती कित्येकांना वाटत होती.पण तास काय झाल नाही यातच आनंद.आता २०१३ न आपल्या गर्भात काय लपविलाय ते त्यालाच माहित,पण आपण त्याच्याकडून चांगल्याच अपेक्षा ठेवू.
                      बाकी वर्ष संपताना अनेकांना हिशोब मांडायची सवय असते.या वर्षात काय मिळवील आणि काय गमावलं याचा .वर्षाचा सुरुवातीला किती संकल्प केले आणि त्यातील किती पूर्ण केले हे पाहिलं तर लक्षात येत कि आपण प्लान करण्यात पटाईत आहोत पण केलेले प्लान वास्तवात उतरविण्यास आपण सोयीस्कर रित्या विसरलो आहोत.पण हे लक्षात मात्र येते वर्षाखेरीस.मग आपण मनाशीच म्हणतो कि आता नाही जमले न मग पुढच्या वर्षी.
प्रत्येक वर्षी ३१ डिसेंबर चा जल्लोष प्रत्येकासाठी वेगळा असेल पिणारे पितील,खाणारे खातील,प्रत्येकाची वेगळी तऱ्हा.प्या पण पिउन गाडी चालविण्याचे उपकार पब्लिकवर करू नका हीच विनंती.
आणि आता या वर्षाला निरोप देताना जमल तर या वर्षी केलेल्या चुका पुढच्या वर्षी होऊ देऊ नका.

सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१२

अर्जुन रणतुंगा व्हर्सेस मन्नान फरास



आमच्या कॉलेजमध्ये  काल अर्जुन रणतुंगा आला होता.तो काल कोल्हापुरात येऊन महालक्ष्मीचे दर्शन घेऊन गेला हि बातमी आजच्या  सकाळ मध्ये वाचली आणि  अर्ध्या  तासातच तो कॉलेजमध्ये येणार हि बातमी समजली.हि बातमी एकूण आख्ख्या कॉलेजमध्ये उत्साहाच वार संचारलं .नुसती धावपळ चालू झाली आमचे अभ्यासू बोयज पण अभ्यास सोडून त्याच्या येण्याची वाट पाहू लागले.तो बारा वाजता येणार हे कळल्यावर मात्र मेक बॉयजची निराशा झाली कारण परवा  ईद होती आणि म्हणून आमच्या मन्नान फरासने आम्हा सर्व मित्रांना त्याच दिवशी बिर्याणीचा पार्टी  द्यायचं  ठरवील होत. आता जर हा कार्यक्रम दीड वाजायच्या आत उरकला नाही तर पुढचा कार्यक्रमाला उशीर होणार हे नक्की होत.
तरीपण आम्ही मोठ्या  श्रद्धेनं   अर्जुन रणतुंगाची वाट बघू लागलो.पण आम्ही हे विसरलो होतो कि शेवटी श्रीलंका भारताच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या जवळ  त्यामुळे आपले गुणधर्म थाडे का होईना जुळणारच.सव्वा बारा झाले,पाहुणे एक वाजला एक वाजला शेवटी दीड वाजले तरी त्याचा काहीच पत्ता नव्हता नव्हता .आमच्या  कावळे ओरडू लागले होते.शेवटी मीच विचार केला कि अर्जुन  रणतुंगा श्रीलंकेचा कप्तान जरी असला आणि  कितीही मोठा  असला तरी तो काय आपल्या फरास आणि त्याच्या  बिर्यानिपेक्षा मोठा नाही.मग आम्ही अर्जुन  रणतुंगा लांबुन नमस्कार केला आणि फरास च्या घराकडे पळालो . अशी हि अर्जुन  रणतुंगा व्हर्सेस मन्नान फरास हि मच फरासनेच जिंकली .मग शेवटी रणतुंगाला  भेटता न आल्यामुळे प्रायश्चित  आम्ही पुसाटी बुरुजाजवळ   
क्रिकेट खेळून व्यक्त केलच.पण एवढ मात्र खर कि आमच्या पाठीमागे तो रणतुंगा आला काय कि गेला काय बिर्यानिपुढे आम्हाला कसलाच सोयरसुतक नव्हत.

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१२

इन्जीनियरांच्या लव्हस्टोऱ्या:मोरपंखी (भाग 4 )

                       मग ओंकारची परवानगी मिळाल्यावर पिंकीने दोघांच्या रीलेशनविषयी तिच्या घरी सांगितलं.तिच्या घरी थोडी खळबळ माजली पण ते सार्वजन ओंकारला चांगले ओळखत असल्याने त्यांनी सरळ ओंकारला त्याच्या घरी हा  विषय काढण्यास सांगितले. मग ओंकाराने आपल उरलं सुरलं धैर्य एकवटून पप्पांना विचारलं,आणि मग पंधरा मिनिटांच्या प्रदीर्घ विचारानंतर पप्पा उद्गारले,

"हे लग्न शक्य नाही ,हे बघ पप्या(ओंकारला घरी पप्या म्हणतात ) अजून तू शिकतोयस ,तुला डिग्री मिळायला अजून तीन वर्ष लागतील कदाचित जास्तीही लागतील मग एवढी वर्ष त्या मुलीचं  लग्न अडवून ठेवन मला तरी बरोबर वाटत नाही "
                 
                      पप्पांकडून हे उत्तर मिळाल्यामुळे ओंकाराने मम्मीशी या विषयी बोलण्याचे टाळले.पण आता ओंकाराची सारी विचारशक्तीच खुंटली होती.पप्पा नाही म्हणतील अशी अपेक्षा त्याने कधीच केली नव्हती.त्याला हा नकार सहनच होत नव्हता.या सगळ्या गोंधळातच त्याचा m3 चा पापर दुसऱ्या दिवशी होता आणि या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अपेक्षेप्रमाणेच पेपर अवगड गेला m3 सुटण्याची काहीच आशा नव्हती आणि आशा मनस्थितीत m3 सुटणे शक्यच नव्हते . याच वेळी पिंकीचे फोन आणि एकनदरीतच या प्रकारामध्ये त्याला concentrate करता येईनासे झाले होते.या मुळे पुढचे ATD,ETCP हे पेपर देखील त्याने या प्रेशरमधेच  दिले . हे तिन्ही पेपर सुटणारच नाहीत हे त्याला समजून चुकले.ETCP चा  पेपर झाल्यावर ओंकाराने थोडा विचार केला आणि आपला मोबइल बंद करून ठेवला आणि सगळ विसरून अभ्यासाला लागला. आणि मोठ्या प्रयत्नाने concentrate  करून उरलेले विषय सोडविले.पुढचे १५ दिवस फोन नाही आणि मेसेजपण नाही.
                         परीक्षा झाल्या झाल्या ओंक्याने मुंबई गाठली.८ जानेवारी हि पिंकीशी भेटण्याची तारीख ठरवली.हि त्यांची भेट त्यांच्या प्रेम  कहाणी सारखीच विचित्र होती.कारण तशी हि त्यांची पहिलीच खरी भेट होती आणि पहिल्या भेटी आधीच त्यांनी आपल लग्न एकमेकांशी ठरवून टाकल होत.दोघेही त्या दिवशी त्यांच्या दूरच्या नातेवाइकांच्या घरी भेटले.पण घरात वादलाधारी माणसे असल्याने त्यांना नीटपणे बोलताच आले नाही.मग काय? शेवटी ओंकार इंजिनियर होता. आणि technology is friend of engineer ओंकाराने मोबाईल उचलला आणि मग दोघांनी समोरासमोर  chating सुरु केले.  आणि १२ तारखेला बाहेर भेटायचा प्लान बनविला.
                         १२ तारखेला दोघे फिरायला बाहेर पडले.दोघे एकमेकांत पूर्णपणे हरविले होते.भावना शब्द बनून बाहेर पडत होत्या.नॉनस्टोप गप्पा चालू होत्या.यावेळी ओंकाराच्या लक्षात आल कि पिंकीशिवाय जगण त्याला शक्य नाही.काहीही झाल तर आता तिच्याशीच लग्न करायचं.ती भेट मनात साठवून ओंकार कोल्हापूरला परतला.घरी आल्यावर त्याने आईला विश्वासात  घेऊन सगळ्या गोष्टी तिला सांगून टाकल्या.आईने पप्पांना समजावून सांगण्याच वाचन दिल.त्यामुळे आता आईच्या शब्दांवर विश्वास ठेवून ओंकार निश्चिंत झाला.
                          इकडे पिंकी येणाऱ्या प्रत्येक स्थळाला नकारच देत होती.शेवटी वैतागून तिचे मामा ओंकारला भेटायला आले,ओंकाराने त्यांना "मला पिंकीशीच लग्न करायचे आहे" हे पटवून दिले मग शेवटी एके दिवशी पिंकीचे वडील ओंकाराच्या पप्पांना भेटले.आणि त्यांना ओंकार आणि पिंकीच्या लग्नाविषयी विचारलं.ओंकाराचे वडील म्हणाले,
           
                           "ओंकारला डिग्री मिळाली कि दोन महिन्याच्या आत लग्नाचा बर उडवून देऊ,तुम्ही निश्चिंत असा "

                             आतल्या रूममधून हे संभाषण ऐकणाऱ्या ओंकारला आता अत्यानंदाने वेड लागायचं बाकी राहील होत.शेवटी आईची शिष्टाई यशस्वी झाली होती.
आता वर्षभरातच दोघांच लग्न होईल.मला आमंत्रण  मिळेल कि नाही कुणास ठाऊक पण लग्नात मी जाणार हे नक्की कारण त्याच्या लग्नात कदाचित मलाही एखादी "मोरपंखी " मिळून जाईल.

सोमवार, ३ सप्टेंबर, २०१२

इन्जीनियरांच्या लव्हस्टोऱ्या:मोरपंखी (भाग 3 )

               
                               ओंक्याला हे सुपरकुल,फब्युलस आणि माइंड ब्लोइंग उत्तर कस सुचलं असेल ते त्याला अजूनही कळलं नाही(एरवी तोंडातून शब्द फुटत नाही साल्याच्या  ).पण या प्रश्नाने आणि उत्तराने दोघेही काय समजायचे ते समजले.प्रपोज न करताच जेव्हा प्रेम मिळत तेव्हा तो आनंद अवर्णनीयच असतो.ज्या व्यक्तीला आपण व्यवस्थितपणे भेटलो देखील नाही त्या व्यक्तीशी जेव्हा ट्युनिंग जुळत आणि ती व्यक्ती आपली आहे अस जेव्हा मन सांगत तेव्हाच ते खर प्रेम असत.पिंकी आणि ओंकार या दोघानाही ते इतक्या सहजपणे मिळालं आहे अस त्यांना वाटत होत.
                   पण एवढ्या सहज तर आजकाल शिवाजी युनिव्हरसिटीचा एक्झाम फॉर्म देखील भरला जात नाही तर मग प्रेम तर फार लांबची गोष्ठ आहे.त्या दोघांची खरी लढाई तर आतापासून सुरु होणार होती.प्रेम करणं फार सोप असत पण ते निभावून नेण महाप्रचंड काम असत हे त्यांना आता कळणार होत.आणि आता हे महाप्रचंड काम ओंकारला करायचं होत.असे मेसेज आणि फोन मध्ये दिवस सुखाने जात होते.आता डिसेंबर उजाडला होतो.तिसऱ्या सेमिस्टरची परीक्षा ७ तारखेपासून सुरु होणार होती.ओंकार परीक्षेच्या तयारीत गुंतला होता.पण इकडे पिंकीची अवस्था बिकट होत चालली होती कारण तिच्या लग्नासाठी वर संशोधन प्रचंड वेगात सुरु होत आणि प्रत्येक येणाऱ्या स्थळाला ती नकार देत सुटली होती.शेवटी घराच्या लोकांच्या इमोशनल प्रेशरला कंटाळून ५ डिसेंबरला तिने ओंकारला फोन लावला आणि सारी परिस्थिती सांगून विचारलं,
                    
              "अरे, माझ्या घरी माझ्या लग्नाची बोलणी सुरु आहे,आपल्या रीलेशनबद्दल घरी सांगू का?" 
                  
           ओंकारासमोर आता फारच मोठ प्रश्नाचींह उभं राहील होत.कारण होय सांगितलं असत तर मोठाच प्रोब्लेम होणार होता,त्याच शिक्षण पूर्ण झाल नसल्यामुळे घरात त्याच्या लग्नाचा विचारदेखील नव्हता.आणि नको म्हटलं तर पिंकीच्या समोरचा  अडचणींचा डोंगर उभं होता.आता "आर या पार " या अट्टीट्युड ने त्याने उत्तर देवून टाकल,

                       " सांग "

 (बिचाऱ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता म्हणा )

क्रमश: ............................................  

रविवार, २ सप्टेंबर, २०१२

इन्जीनियरांच्या लव्हस्टोऱ्या:मोरपंखी (भाग 2 )


                            कसबस ताईच लग्न पार पडलं,पण रात्रभर ओंक्याच्या डोळ्यावर ती मोरपंखीच उभी राहत होती,उसने तो ईस बिचारे कि रातोंकी निंद हराम कर दि थी.आता ओंक्याला काहीही करून तिला भेटन भागच होत.लग्नानंतर ताईच्या सासरी गोंधळ होता,घरून सगळेच जाणार होते.ताईकडे जाण्याची तयारी पूर्ण झाली होती ओंक्या अगदी ठेवणीतले कपडे घालून तयार झाला.पण बाहेर येऊन बघतो तर काय? गाडीच्या फॅक्टर ऑफ सेफ्टी पेक्षा दुप्पट माणस बसल्यामुळे त्याला जागाच उरली नव्हती.त्याला न्यायचं कॅन्सल करायचा विषय चालू झाला आणि एवढ्यात त्याच्या बाबांचं लक्ष त्याच्या चेहऱ्याकडे गेलं.त्याचा रडका चेहरा बघून त्याला त्याच्या ताईची फारच आठवण येत असेल असा गैरसमज त्याच्या बाबांनी करून घेतला आणि मग त्यांनी नवीन गाडी भाड्याने घेतली.रात्री ताईच्या घरी पोचल्यानंतर ओंक्याची नजर सारखी आत वळत होती.या नव्या पाहुण्याला फारच भूक लागली असेल म्हणून पटकन पंगती वाढायला सुरुवात झाली.इतक्यात ती वाढायला आली आणि तिला पाहताच ओंक्याच्या अंगात बकासुर संचारला आणि ओंक्याने मग भावनेच्या  भरात तांबडा रस्सा,पांढरा रस्सा आणि मटनावर मनसोक्त ताव मारला.
                          जाताना  ताईची भेट घ्यायला गेला तेव्हा तिथे ती मोरपंखी बसलेली होती.ताईने मग दोघांची ओळख करून दिली. " पिंकी " हे नाव ऐकताच त्याने मनातल्या मनात " पिंकी ओंकार चव्हाण " या नावांची जुळवाजुळव केली हे नाव परफेक्ट जमतंय अस त्याच्या मनाला उगाचच वाटून गेलं.आणि तिथल्या गप्पांमध्ये पिंकीला मटणाचा वासही सहन होत नाही हे ऐकताच खाल्लेलं सार मटण गळ्याशी येतंय कि काय अस त्याला वाटून गेलं.आता तर मग ओंक्याने फुल अक्शनमध्ये येवून प्रतिज्ञाच केली,"पिंकी,तुमच्यासाठी कायपण,"सोडलय आता आम्ही मटनपण" या क्षणी ओंक्याने त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा त्याग पिंकीसाठी केला होता.जेव्हा एखादा कोल्हापूरचा माणूस कुणासाठीतरी मटण सोडतो तेव्हा त्याला आपलं प्रेम सिद्ध करायला दुसर कुठलच प्रमाणपत्र द्यावं लागत नाही.कारण मटण खाण सोडन आणि तेही एका कोल्हापुरकराने हा त्याच्या त्यागाचा परमोच्च बिंदू असतो.
काही दिवसातच मग सत्यनारायणाची पूजा होती , ओंक्याला आणखी एक चान्स मिळाला होता.या पूजेत ओंक्याने फारच प्रगती साधली होती त्याच्या प्रगती समोर तर चीनच्या प्रगतीचा दरही फिका पडला होता.पूजेच्या संपूर्ण संध्याकाळी नजरांचे बाण सटासट चालविले जात होते.ओंक्या तर क्षणाक्षणाला घायाळ होत होता.शेवटी निरोपाच्या क्षण आलाच.गाडीत बसताना पिंकीने ओंक्याला स्माईल दिली आणि एवढ्यात विजांच्या गडगडाटसह पाऊस सुरु झाला.एका वेगळ्याच रोमांटिक आनंदात ओंक्या परतीचा प्रवास करीत होता.बाहेर पडणारा पाऊस त्याच्या मनातील कल्लोळासमोर क्षणाक्षणाला फिका पडत चालला होता.आतातर ओंक्याला गप्प बसून चालणार नव्हता त्याने प्रचंड खटपटी करून सरतेशेवटी नंबर मिळविलाच.
                             २० जूनला त्याने तिला पहिला मेसेज केला.हाय ह्यालोपासून सुरुवात झाली.इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत गाडी मुख्य रस्त्याकडे हळूहळू सरकू लागली होती,आणि प्रेमाचं इंजिन बेफामपणे धावू लागल होत. आपली परफेक्ट मच हीच आहे याची खात्री ह्या दोघांनाही हळूहळू पटू लागली होती.अश्याच एका निवांत क्षणी २२ जूनला पिंकीने ओंकारसमोर प्रश्नाचा अनपेक्षित बॉम्ब टाकला,
         "तुझा प्रेमावर विश्वास आहे?"
         .
         .
         .
         "माझा जेवढा तुझ्यावर विश्वास आहे तेवढाच विश्वास माझा प्रेमावर आहे." 
    

क्रमश: ............................................  

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
HTML Comment Box is loading comments...