रविवार, ३० डिसेंबर, २०१२

वर्षाखेर


                                          "अलविदा २०१२" 

                     आणखी एक वर्ष सरलं .२०१२ संपल पण जग काही बदल नाही यातच सगळा आनंद आहे.कारण या वर्षातील महागाई ,बलात्कार,अपघात या सर्वांचा जो महापूर आला होता तो पाहून जग नक्की बुडणार अशी धास्ती कित्येकांना वाटत होती.पण तास काय झाल नाही यातच आनंद.आता २०१३ न आपल्या गर्भात काय लपविलाय ते त्यालाच माहित,पण आपण त्याच्याकडून चांगल्याच अपेक्षा ठेवू.
                      बाकी वर्ष संपताना अनेकांना हिशोब मांडायची सवय असते.या वर्षात काय मिळवील आणि काय गमावलं याचा .वर्षाचा सुरुवातीला किती संकल्प केले आणि त्यातील किती पूर्ण केले हे पाहिलं तर लक्षात येत कि आपण प्लान करण्यात पटाईत आहोत पण केलेले प्लान वास्तवात उतरविण्यास आपण सोयीस्कर रित्या विसरलो आहोत.पण हे लक्षात मात्र येते वर्षाखेरीस.मग आपण मनाशीच म्हणतो कि आता नाही जमले न मग पुढच्या वर्षी.
प्रत्येक वर्षी ३१ डिसेंबर चा जल्लोष प्रत्येकासाठी वेगळा असेल पिणारे पितील,खाणारे खातील,प्रत्येकाची वेगळी तऱ्हा.प्या पण पिउन गाडी चालविण्याचे उपकार पब्लिकवर करू नका हीच विनंती.
आणि आता या वर्षाला निरोप देताना जमल तर या वर्षी केलेल्या चुका पुढच्या वर्षी होऊ देऊ नका.

सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१२

अर्जुन रणतुंगा व्हर्सेस मन्नान फरास



आमच्या कॉलेजमध्ये  काल अर्जुन रणतुंगा आला होता.तो काल कोल्हापुरात येऊन महालक्ष्मीचे दर्शन घेऊन गेला हि बातमी आजच्या  सकाळ मध्ये वाचली आणि  अर्ध्या  तासातच तो कॉलेजमध्ये येणार हि बातमी समजली.हि बातमी एकूण आख्ख्या कॉलेजमध्ये उत्साहाच वार संचारलं .नुसती धावपळ चालू झाली आमचे अभ्यासू बोयज पण अभ्यास सोडून त्याच्या येण्याची वाट पाहू लागले.तो बारा वाजता येणार हे कळल्यावर मात्र मेक बॉयजची निराशा झाली कारण परवा  ईद होती आणि म्हणून आमच्या मन्नान फरासने आम्हा सर्व मित्रांना त्याच दिवशी बिर्याणीचा पार्टी  द्यायचं  ठरवील होत. आता जर हा कार्यक्रम दीड वाजायच्या आत उरकला नाही तर पुढचा कार्यक्रमाला उशीर होणार हे नक्की होत.
तरीपण आम्ही मोठ्या  श्रद्धेनं   अर्जुन रणतुंगाची वाट बघू लागलो.पण आम्ही हे विसरलो होतो कि शेवटी श्रीलंका भारताच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या जवळ  त्यामुळे आपले गुणधर्म थाडे का होईना जुळणारच.सव्वा बारा झाले,पाहुणे एक वाजला एक वाजला शेवटी दीड वाजले तरी त्याचा काहीच पत्ता नव्हता नव्हता .आमच्या  कावळे ओरडू लागले होते.शेवटी मीच विचार केला कि अर्जुन  रणतुंगा श्रीलंकेचा कप्तान जरी असला आणि  कितीही मोठा  असला तरी तो काय आपल्या फरास आणि त्याच्या  बिर्यानिपेक्षा मोठा नाही.मग आम्ही अर्जुन  रणतुंगा लांबुन नमस्कार केला आणि फरास च्या घराकडे पळालो . अशी हि अर्जुन  रणतुंगा व्हर्सेस मन्नान फरास हि मच फरासनेच जिंकली .मग शेवटी रणतुंगाला  भेटता न आल्यामुळे प्रायश्चित  आम्ही पुसाटी बुरुजाजवळ   
क्रिकेट खेळून व्यक्त केलच.पण एवढ मात्र खर कि आमच्या पाठीमागे तो रणतुंगा आला काय कि गेला काय बिर्यानिपुढे आम्हाला कसलाच सोयरसुतक नव्हत.

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१२

इन्जीनियरांच्या लव्हस्टोऱ्या:मोरपंखी (भाग 4 )

                       मग ओंकारची परवानगी मिळाल्यावर पिंकीने दोघांच्या रीलेशनविषयी तिच्या घरी सांगितलं.तिच्या घरी थोडी खळबळ माजली पण ते सार्वजन ओंकारला चांगले ओळखत असल्याने त्यांनी सरळ ओंकारला त्याच्या घरी हा  विषय काढण्यास सांगितले. मग ओंकाराने आपल उरलं सुरलं धैर्य एकवटून पप्पांना विचारलं,आणि मग पंधरा मिनिटांच्या प्रदीर्घ विचारानंतर पप्पा उद्गारले,

"हे लग्न शक्य नाही ,हे बघ पप्या(ओंकारला घरी पप्या म्हणतात ) अजून तू शिकतोयस ,तुला डिग्री मिळायला अजून तीन वर्ष लागतील कदाचित जास्तीही लागतील मग एवढी वर्ष त्या मुलीचं  लग्न अडवून ठेवन मला तरी बरोबर वाटत नाही "
                 
                      पप्पांकडून हे उत्तर मिळाल्यामुळे ओंकाराने मम्मीशी या विषयी बोलण्याचे टाळले.पण आता ओंकाराची सारी विचारशक्तीच खुंटली होती.पप्पा नाही म्हणतील अशी अपेक्षा त्याने कधीच केली नव्हती.त्याला हा नकार सहनच होत नव्हता.या सगळ्या गोंधळातच त्याचा m3 चा पापर दुसऱ्या दिवशी होता आणि या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अपेक्षेप्रमाणेच पेपर अवगड गेला m3 सुटण्याची काहीच आशा नव्हती आणि आशा मनस्थितीत m3 सुटणे शक्यच नव्हते . याच वेळी पिंकीचे फोन आणि एकनदरीतच या प्रकारामध्ये त्याला concentrate करता येईनासे झाले होते.या मुळे पुढचे ATD,ETCP हे पेपर देखील त्याने या प्रेशरमधेच  दिले . हे तिन्ही पेपर सुटणारच नाहीत हे त्याला समजून चुकले.ETCP चा  पेपर झाल्यावर ओंकाराने थोडा विचार केला आणि आपला मोबइल बंद करून ठेवला आणि सगळ विसरून अभ्यासाला लागला. आणि मोठ्या प्रयत्नाने concentrate  करून उरलेले विषय सोडविले.पुढचे १५ दिवस फोन नाही आणि मेसेजपण नाही.
                         परीक्षा झाल्या झाल्या ओंक्याने मुंबई गाठली.८ जानेवारी हि पिंकीशी भेटण्याची तारीख ठरवली.हि त्यांची भेट त्यांच्या प्रेम  कहाणी सारखीच विचित्र होती.कारण तशी हि त्यांची पहिलीच खरी भेट होती आणि पहिल्या भेटी आधीच त्यांनी आपल लग्न एकमेकांशी ठरवून टाकल होत.दोघेही त्या दिवशी त्यांच्या दूरच्या नातेवाइकांच्या घरी भेटले.पण घरात वादलाधारी माणसे असल्याने त्यांना नीटपणे बोलताच आले नाही.मग काय? शेवटी ओंकार इंजिनियर होता. आणि technology is friend of engineer ओंकाराने मोबाईल उचलला आणि मग दोघांनी समोरासमोर  chating सुरु केले.  आणि १२ तारखेला बाहेर भेटायचा प्लान बनविला.
                         १२ तारखेला दोघे फिरायला बाहेर पडले.दोघे एकमेकांत पूर्णपणे हरविले होते.भावना शब्द बनून बाहेर पडत होत्या.नॉनस्टोप गप्पा चालू होत्या.यावेळी ओंकाराच्या लक्षात आल कि पिंकीशिवाय जगण त्याला शक्य नाही.काहीही झाल तर आता तिच्याशीच लग्न करायचं.ती भेट मनात साठवून ओंकार कोल्हापूरला परतला.घरी आल्यावर त्याने आईला विश्वासात  घेऊन सगळ्या गोष्टी तिला सांगून टाकल्या.आईने पप्पांना समजावून सांगण्याच वाचन दिल.त्यामुळे आता आईच्या शब्दांवर विश्वास ठेवून ओंकार निश्चिंत झाला.
                          इकडे पिंकी येणाऱ्या प्रत्येक स्थळाला नकारच देत होती.शेवटी वैतागून तिचे मामा ओंकारला भेटायला आले,ओंकाराने त्यांना "मला पिंकीशीच लग्न करायचे आहे" हे पटवून दिले मग शेवटी एके दिवशी पिंकीचे वडील ओंकाराच्या पप्पांना भेटले.आणि त्यांना ओंकार आणि पिंकीच्या लग्नाविषयी विचारलं.ओंकाराचे वडील म्हणाले,
           
                           "ओंकारला डिग्री मिळाली कि दोन महिन्याच्या आत लग्नाचा बर उडवून देऊ,तुम्ही निश्चिंत असा "

                             आतल्या रूममधून हे संभाषण ऐकणाऱ्या ओंकारला आता अत्यानंदाने वेड लागायचं बाकी राहील होत.शेवटी आईची शिष्टाई यशस्वी झाली होती.
आता वर्षभरातच दोघांच लग्न होईल.मला आमंत्रण  मिळेल कि नाही कुणास ठाऊक पण लग्नात मी जाणार हे नक्की कारण त्याच्या लग्नात कदाचित मलाही एखादी "मोरपंखी " मिळून जाईल.

सोमवार, ३ सप्टेंबर, २०१२

इन्जीनियरांच्या लव्हस्टोऱ्या:मोरपंखी (भाग 3 )

               
                               ओंक्याला हे सुपरकुल,फब्युलस आणि माइंड ब्लोइंग उत्तर कस सुचलं असेल ते त्याला अजूनही कळलं नाही(एरवी तोंडातून शब्द फुटत नाही साल्याच्या  ).पण या प्रश्नाने आणि उत्तराने दोघेही काय समजायचे ते समजले.प्रपोज न करताच जेव्हा प्रेम मिळत तेव्हा तो आनंद अवर्णनीयच असतो.ज्या व्यक्तीला आपण व्यवस्थितपणे भेटलो देखील नाही त्या व्यक्तीशी जेव्हा ट्युनिंग जुळत आणि ती व्यक्ती आपली आहे अस जेव्हा मन सांगत तेव्हाच ते खर प्रेम असत.पिंकी आणि ओंकार या दोघानाही ते इतक्या सहजपणे मिळालं आहे अस त्यांना वाटत होत.
                   पण एवढ्या सहज तर आजकाल शिवाजी युनिव्हरसिटीचा एक्झाम फॉर्म देखील भरला जात नाही तर मग प्रेम तर फार लांबची गोष्ठ आहे.त्या दोघांची खरी लढाई तर आतापासून सुरु होणार होती.प्रेम करणं फार सोप असत पण ते निभावून नेण महाप्रचंड काम असत हे त्यांना आता कळणार होत.आणि आता हे महाप्रचंड काम ओंकारला करायचं होत.असे मेसेज आणि फोन मध्ये दिवस सुखाने जात होते.आता डिसेंबर उजाडला होतो.तिसऱ्या सेमिस्टरची परीक्षा ७ तारखेपासून सुरु होणार होती.ओंकार परीक्षेच्या तयारीत गुंतला होता.पण इकडे पिंकीची अवस्था बिकट होत चालली होती कारण तिच्या लग्नासाठी वर संशोधन प्रचंड वेगात सुरु होत आणि प्रत्येक येणाऱ्या स्थळाला ती नकार देत सुटली होती.शेवटी घराच्या लोकांच्या इमोशनल प्रेशरला कंटाळून ५ डिसेंबरला तिने ओंकारला फोन लावला आणि सारी परिस्थिती सांगून विचारलं,
                    
              "अरे, माझ्या घरी माझ्या लग्नाची बोलणी सुरु आहे,आपल्या रीलेशनबद्दल घरी सांगू का?" 
                  
           ओंकारासमोर आता फारच मोठ प्रश्नाचींह उभं राहील होत.कारण होय सांगितलं असत तर मोठाच प्रोब्लेम होणार होता,त्याच शिक्षण पूर्ण झाल नसल्यामुळे घरात त्याच्या लग्नाचा विचारदेखील नव्हता.आणि नको म्हटलं तर पिंकीच्या समोरचा  अडचणींचा डोंगर उभं होता.आता "आर या पार " या अट्टीट्युड ने त्याने उत्तर देवून टाकल,

                       " सांग "

 (बिचाऱ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता म्हणा )

क्रमश: ............................................  

रविवार, २ सप्टेंबर, २०१२

इन्जीनियरांच्या लव्हस्टोऱ्या:मोरपंखी (भाग 2 )


                            कसबस ताईच लग्न पार पडलं,पण रात्रभर ओंक्याच्या डोळ्यावर ती मोरपंखीच उभी राहत होती,उसने तो ईस बिचारे कि रातोंकी निंद हराम कर दि थी.आता ओंक्याला काहीही करून तिला भेटन भागच होत.लग्नानंतर ताईच्या सासरी गोंधळ होता,घरून सगळेच जाणार होते.ताईकडे जाण्याची तयारी पूर्ण झाली होती ओंक्या अगदी ठेवणीतले कपडे घालून तयार झाला.पण बाहेर येऊन बघतो तर काय? गाडीच्या फॅक्टर ऑफ सेफ्टी पेक्षा दुप्पट माणस बसल्यामुळे त्याला जागाच उरली नव्हती.त्याला न्यायचं कॅन्सल करायचा विषय चालू झाला आणि एवढ्यात त्याच्या बाबांचं लक्ष त्याच्या चेहऱ्याकडे गेलं.त्याचा रडका चेहरा बघून त्याला त्याच्या ताईची फारच आठवण येत असेल असा गैरसमज त्याच्या बाबांनी करून घेतला आणि मग त्यांनी नवीन गाडी भाड्याने घेतली.रात्री ताईच्या घरी पोचल्यानंतर ओंक्याची नजर सारखी आत वळत होती.या नव्या पाहुण्याला फारच भूक लागली असेल म्हणून पटकन पंगती वाढायला सुरुवात झाली.इतक्यात ती वाढायला आली आणि तिला पाहताच ओंक्याच्या अंगात बकासुर संचारला आणि ओंक्याने मग भावनेच्या  भरात तांबडा रस्सा,पांढरा रस्सा आणि मटनावर मनसोक्त ताव मारला.
                          जाताना  ताईची भेट घ्यायला गेला तेव्हा तिथे ती मोरपंखी बसलेली होती.ताईने मग दोघांची ओळख करून दिली. " पिंकी " हे नाव ऐकताच त्याने मनातल्या मनात " पिंकी ओंकार चव्हाण " या नावांची जुळवाजुळव केली हे नाव परफेक्ट जमतंय अस त्याच्या मनाला उगाचच वाटून गेलं.आणि तिथल्या गप्पांमध्ये पिंकीला मटणाचा वासही सहन होत नाही हे ऐकताच खाल्लेलं सार मटण गळ्याशी येतंय कि काय अस त्याला वाटून गेलं.आता तर मग ओंक्याने फुल अक्शनमध्ये येवून प्रतिज्ञाच केली,"पिंकी,तुमच्यासाठी कायपण,"सोडलय आता आम्ही मटनपण" या क्षणी ओंक्याने त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा त्याग पिंकीसाठी केला होता.जेव्हा एखादा कोल्हापूरचा माणूस कुणासाठीतरी मटण सोडतो तेव्हा त्याला आपलं प्रेम सिद्ध करायला दुसर कुठलच प्रमाणपत्र द्यावं लागत नाही.कारण मटण खाण सोडन आणि तेही एका कोल्हापुरकराने हा त्याच्या त्यागाचा परमोच्च बिंदू असतो.
काही दिवसातच मग सत्यनारायणाची पूजा होती , ओंक्याला आणखी एक चान्स मिळाला होता.या पूजेत ओंक्याने फारच प्रगती साधली होती त्याच्या प्रगती समोर तर चीनच्या प्रगतीचा दरही फिका पडला होता.पूजेच्या संपूर्ण संध्याकाळी नजरांचे बाण सटासट चालविले जात होते.ओंक्या तर क्षणाक्षणाला घायाळ होत होता.शेवटी निरोपाच्या क्षण आलाच.गाडीत बसताना पिंकीने ओंक्याला स्माईल दिली आणि एवढ्यात विजांच्या गडगडाटसह पाऊस सुरु झाला.एका वेगळ्याच रोमांटिक आनंदात ओंक्या परतीचा प्रवास करीत होता.बाहेर पडणारा पाऊस त्याच्या मनातील कल्लोळासमोर क्षणाक्षणाला फिका पडत चालला होता.आतातर ओंक्याला गप्प बसून चालणार नव्हता त्याने प्रचंड खटपटी करून सरतेशेवटी नंबर मिळविलाच.
                             २० जूनला त्याने तिला पहिला मेसेज केला.हाय ह्यालोपासून सुरुवात झाली.इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत गाडी मुख्य रस्त्याकडे हळूहळू सरकू लागली होती,आणि प्रेमाचं इंजिन बेफामपणे धावू लागल होत. आपली परफेक्ट मच हीच आहे याची खात्री ह्या दोघांनाही हळूहळू पटू लागली होती.अश्याच एका निवांत क्षणी २२ जूनला पिंकीने ओंकारसमोर प्रश्नाचा अनपेक्षित बॉम्ब टाकला,
         "तुझा प्रेमावर विश्वास आहे?"
         .
         .
         .
         "माझा जेवढा तुझ्यावर विश्वास आहे तेवढाच विश्वास माझा प्रेमावर आहे." 
    

क्रमश: ............................................  

मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१२

इन्जीनियरांच्या लव्हस्टोऱ्या:मोरपंखी (भाग १ )

                          इंजिनियरिंग स्टूडंटस मध्ये इंजिनियर कमी आणि प्रेमवीरच जास्त सापडतील.अशाच एका प्रेमवीराची हि कहाणी.इन्जीनियरांप्रमाणे त्यांच्या लव्हस्ठोर्यादेखील भन्नाट आणि एकदम वेगळ्या असतात. तसं पहायला गेलं तर हे स्वाभाविकच आहे म्हणा.पण अस्वभाविकारीत्या मागच्या वर्षी यामध्ये आणखी एका मेक बॉयची भर पडली,"ओंकार चव्हाण" हे संजीवनच्या मेक ब्रांचमधील एक मोठ आणि वजनदार प्रस्थ.(वजनदार म्हणजे याच्या शब्दाला मोठ वजन आहे आमच्या ब्रांचमध्ये ).काही लव्हस्टोऱ्या या हसवून डोळ्यात पाणी आणतात तर काही रडवून ओंकार आणि पिंकीची लव्हस्टोरी मात्र प्रेरणादायी प्रकारात मोडते.(मोटीवेशनल).ह्या दोघांची लव्हस्टोरी एकूण तर आमच्या कोलेजात कित्येकांना प्रेरणा मिळालीय( मलापण ).ह्यांची प्रेमकहाणी ऐकल्यावर ८० च्या दशकातील चित्रपटांची आठवण येते.तर आता आणखी जास्त प्रास्ताविक  न सांगता मी मूळ मुद्द्यावर येतो.
                          २८ मे २०१० पर्यंत प्रेम या गोष्टीवर अजिबात विश्वास न ठेवणारा ओंकार आपल्या ताईच्या लग्नाच्या तयारीत गुंतला होता.नेहमी प्रेम या गोष्टीची चेष्टा करणाऱ्या बिचाऱ्या ओंक्याला येत्या २४ तासात आपणही कुणाच्या तरी हृदयात नजरबंद होऊ याची पुसटशी देखील कल्पना नव्हती. २९ मे उजाडला आणि आपल्या लाडक्या , एकुलत्या एक बहिणीच्या लग्नात  ओंक्याने स्वत:ला सगळ्या तयारीत झोकून दिले होते.लग्न धुमधडाक्यात होत होत.लग्नात मानाचं असणारं " करवला " हे पद त्याच्याकडे असल्यामुळे वरपक्षाच्या बाजूकडे त्याची नजर सराईतपणे भिरभिरत होती.आणि इतक्यात त्याची नजर एका मोरपंखी रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेल्या मुलीकडे गेली.आणि मग काय विचारता "दिल कि घंटी बज गयी" त्या मोरपंखी रंगात ती प्रचंड सुंदर दिसत होती,(तशा लग्नात साऱ्याच मुली सुंदर दिसतात म्हणा,अर्धा किलो मेकअप केल्यावर दुसर काय होणार.)हा तर अश्या या स्वप्नातल्या परीजवळ ओंक्या आला आणि पाठीमागे गान सुरु झालं,
                        "पहला पहला प्यार है,पहली पहली बार है "

                        आता  ओंक्याला तिच्यात माधुरी आणि आराश्यात सलमान दिसू लागला होता.
                       गेले  पंधरा दिवस लग्नातलं प्रत्येक काम नीट करणाऱ्या ओंक्याच्या हातून आता चुका होऊ लागल्या होत्या,दाजींच्या बुटाऐवजी जेव्हा त्याने ताईच्याच चपला चोरल्या तेव्हा ते कुणाला कळलं नाही पण लग्नात जेव्हा तांदळाच्या ऐवजी साखर वाटू लागला तेव्हा मात्र सगळ्या मांडवात हास्याची लाट उसळली.पण काम करून दमला असेल बिचारा या सबबीखाली त्याला माफ करण्यात आला. खरी मजा तर पुढेच आली जेवण वाढताना.लग्न झाल्यावर ओंकारराव जेवणाच्या पंगती वाढू लागला.त्या मोरपंखीला आम्रखंड आवडत अस दिसून आल्यावर त्याने आम्रखंड वाढायला घेतलं.बायकांच्या पंगतीत २० वेळा वाढून झालं तरी हा तिथच ऊभा.त्या मोरपंखीच्या शेजारी बसलेल्या काकुना वाढताना त्यांच्या ताटात भातापेक्षा आम्रखंड जास्त झालंय आणि त्या काकूंना डायबेटीस आहे हे कळताच मात्र त्याने तिथून काढता पाय घेतला.



क्रमश...................

बुधवार, २२ ऑगस्ट, २०१२

माझ्या त्या साऱ्या कविता

कधीतरी बसतो असाच एकटाच लिहित 
मग कविता येते फुलून माझ्या वहीत 
सागराला मिळेल जेव्हा माझ्या जीवनाची सरिता
सोबत करतील मला तेव्हा माझ्या त्या साऱ्या कविता

वार्धक्याच्या त्या ओसाड रानात 
तारुण्य भेटेल मला पुन्हा कवितेच्या रुपात
निराशेने  त्या अंधारलेल्या  मनात 
कविता देतील मला आशेची खैरात

काहीही झाल तरी त्या माझ्याच असतील
पडलो झडलो तर मला सावरतील
उन,वारा ,पावसात मला जपतील
शेवटपर्यंत माझ्याशी त्या एकनिष्ठ राहतील

एखादी हसवेल,एखादी रडवेल
तो आनंद अन ती वेदना माझीच असेल
हक्क असेल माझाच कवितांवर साऱ्या 
जग मला विसरल्यावर सोबती होतील त्या खऱ्या

सरणावर पडलो तरी डोक्यात सदा फिरत राहतील
मरणावरही माझ्या त्या चार अश्रू तरी ढाळतील
मेल्यानंतरही त्या मला जिवंत ठेवतील
माझ्या त्या साऱ्या कविता माझ्या मरणाला अर्थ मिळवून देतील 

                                .............................................निखील माने 

बुधवार, १५ ऑगस्ट, २०१२

फर्स्ट यिअर

                                      फर्स्ट यिअर सुरु झाल एकदाच.नवे चेहरे,नवे मित्र(मैत्रीनीसुदधा),नावे चेहरे,सगळच नव नवीन वाटू लागलय.मरगळलेल्या कोलेज मध्ये नवीन चैतन्य भरून आल्यासारख वाटत.त्यांच्या चेहऱ्यावरील आश्चर्य,त्यांच्या डोळ्यातील स्वप्ने कुठेतरी ओळखीची वाटतात.त्यांच्या मनातील भीती तर स्वत:चीच आठवण आणून देते.तीन वर्षापूर्वी आपण कसे होतो याची आठवण आपसूकच जागी झाली. यांच्या शंका आणि यांचे प्रश्न हसून हसून पोट दुखविणारे असतात पण ते विचारण्यामागची त्यांची निरागसता काही लपत नाही.
                                     नुकतेच बारावी आणि CET च्या चरख्यातून मुक्त झाल्यामुळे झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यातून पदोपदी दिसून येत होता."आता सुटलो एकदाचे" हा भाव त्यांच्या प्रत्येक हालचालीतून दिसून येत होता. त्यांच्या मनात हजारो स्वप्ने उसळी मारतायत हे त्यांच्या चेहऱ्यावरून सहजपणे दिसून येत होत.पण काही दिवसात हा आनंद लोपनार हे आम्हाला माहित असल तरी या सगळ्याची जाणीव त्यांना करून देण्याचं धाडस आम्हाला झालं नाही कारण स्वप्न चुरगाळल्यावर काय होत हे आम्हाला माहित होत म्हणून जर वाट लागणारच आहे तर मग एवढी गडबड कशाला करा ह्या अट्टीट्युडने आम्ही गप्प बसून तो ओसंडून  वाहणारा उत्साह पाहण्यातच समाधान मानलं.
                                   पण ह्या फर्स्ट यिअर पेक्षा खरे उत्साही तर आमच्यातले काही हौशी कलाकार होते(विशेषत: मेक बॉयज).फर्स्ट यिअरच्या कुठल्या क्लास मध्ये किती चांगल्या मुली यापासून ते या वर्षातील सर्वात सुंदर मुलगी (लेखनमर्यादा जाणाव्यात खरा शब्द दुसरा आहे) हा किताबाची मानकरी ठरवली जाते.एकमेकांच्या वहिन्या ठरविल्या जातात(हे फक्त ठरविण्यापुरतच मर्यादित असतं कारण करण किती अवघड आहे हे सर्वांनाच माहित झालेलं असतं ).
                                  आता नव्याचे नऊ दिवस संपतील आणि हे नवीन दोस्त कधी इंजिनियरिंगच्या रंगात रंगून जातील हे कळायचंदेखील नाही.आता यांच्यातूनच मग नवे इंजिनियर निर्माण होणार आहेत यांचे पण किस्से ऐकायला मिळतील,यांच्यापण लव्हस्टोरया बनतील आणि हे पण मग या कॉलेजमधून बाहेर पडतील.& a circle will complete again....................................

सोमवार, १३ ऑगस्ट, २०१२

इन्जीनियरांच्या लव्हस्टोऱ्या:सुश्याचं प्रेमपत्र(भाग 3)


                     मी ताडकन उभं राहिलो.हि वेळ येणार हे माहित होत पण येवढ्या लवकर येईल हि अपेक्षा मी काय कुणीच केली नव्हती.अंतर्बाह्य हादरने या लहानपणी शिकलेल्या वाकप्रचाराचा अनुभव  मला  आत्ता पहिल्यांदाच येत होता.बिचाऱ्या सुश्याचा चेहरा सारखा समोर येत होता आणि या धक्क्यातून स्वत:ला कसाबसा सावरून घेत होतो तोच शेजारी बसलेल्या उम्याने स्वत:च्या मंद,मूर्ख आणि अतिशहाण्या  स्वभावाला अनुसरून प्रश्न विचारलाच,
                   "कुणाशी?"
                   "घुमे सरांशी!"
                     प्रमाणापेक्षा जास्तच लाजत फुगा उत्तरली.हे तीच उत्तर ऐकून आत्ताच्या आता हि धरती दुभंगावी आणि तिने मला पोटात घ्यावं असं वाटल नाहीतर कमीत कमी पुढच्या भिंतीवरून उडी टाकून जीव द्यावा अशी इच्छा मनात उफाळून आली.पण माझ्या आईला नातवंडांचा चेहरा पहायची इच्छा असल्याने मी स्वत:ला आवरलं.या सलग दोन धक्क्यातून सावरायच्या आतच फुगा माझ्या नावाची पत्रिका देऊन निघूनही गेली होती.
                    पंधरा मिनिटानंतर सावरलो,पण हे कस घडल याचा विचार करू लागलो.मग तिच्या काही मैत्रीण आणि माझे स्टाफरूम मधील सोर्स वापरून मिळालेल्या त्रोटक माहितीच्या आधारे जेव्हा वस्तूस्थितीच  जे काही चित्र उभं राहिलं तेव्हा तर  मी बेशुध्द पडायचा बाकी राहिलो होतो. खरी गोष्ट अशी होती कि,सुश्याने जेव्हा  टयुटोरीअलमधून प्रेमपत्र फुगला तील तेव्हा तिने ते उतरून उतरून काढलं पण ते लिहिताना "सबमिशन करताना त्यातील माहित हि गोपनीय आहे असे समजून मी ती कधीच वाचणार नाही "या इंजिनियरिंग स्तुडंतच्या प्रतीत्नेची तिने पुरेपूर आठवण ठेवली होती.आणि सुश्याच ते दोन पाणी प्रेमपत्र उतरून काढताना त्यातील एक अक्षरही वाचण्याचा त्रास तीन आपल्या अवजड शरीराला दिला नाही . आणि लिहून झाल्यावर ते घुमे सरांना सबमिट केल.आणि सरांनी आपल्या महाखडूस,महा........,महा............. (teacher's day जवळ आला असल्याने शब्द आणि भावना आवरल्या आहेत )स्वभावाला अनुसरून तीच एक ना एक अक्षर वाचून काढलं आणि त्या पत्रात नावं नसल्याने गैरसमज करून घेतला.त्यावेळी नक्की काय झाल असेल माहित नाही पण नक्कीच हा माणूस मायकल  ज्याक्सनचा  बाप बनून नाचला असणार हे नक्की! कारण अभ्यास करून पडलेल टक्कल ,रात्री जागरणं करून(कशासाठी जागत असेल हे कृपया विचारू नका ) डोळ्याभोवतीची वर्तुळ आणि जरा जास्तच शिकल्याने लग्नाचं उलटून गेलेलं  वय असं तगड आणि रुबाबदार व्यक्तिमत्व असलेल्या माणसाला अशावेळी हर्षवायू होणे स्वाभाविकच आहे.
                     मग काय! घुमे सर आपला सारा गोतावळा घेऊन फुगाच्या घरी हजार झाले.आणि सोयरिक जमवूनच बाहेर पडले.कारण ५०,००० पगाराचा जावई मिळन तसं भाग्याचाच लक्षण.म्हणून फुगाच्या वडिलांनी लगेच होकार कळवू टाकला आणि एवढा वेल सेटल(कि मेंटल)  नवरा मिळाल्यामुळे फुगाच्या नकाराचा प्रश्नच नव्हता.अश्या प्रमाणे फुगाच लग्न सरतेशेवटी ठरलं,घुमे सराच्या चेहऱ्यावरील आनंद कारंज्याप्रमाणे फुटून येत होता खरतर त्यांना हसताना आम्ही सगळे पहिल्यांदाच पाहत होतो..
                   आता हसावं कि रडावं हेच समजेनास झाल म्हणून शांतपणे बाहेर पडलो,सागरच्या दुकानातून दोन पाकीट घेतली,मोबाईल वर देवदासची गाणी डाऊनलोडीन्ग्ला टाकली आणि सुश्याची समजूत कशी काढायची या विवंचनेत त्याच्या रूमकडे चालू लागलो.........................

इन्जीनियरांच्या लव्हस्टोऱ्या:सुश्याचं प्रेमपत्र(भाग 2)

                       ते प्रेमपत्र त्याने मग नुकत्याच लिहिलेल्या टयुटोरीअलमध्ये अलगद ठेवून दिलं,टयुटोरीअल लिहील कि तो ते पहिल्यांदा फुगालाच देतो हे आतापर्यंत संपूर्ण पन्हाळा तालुक्याला माहित झालं होत.एवढ महान कार्य पार पडून सुशान्तराव शेवटी झोपी गेले.पण मला झोपी जाऊन चालणार नव्हत,मी पहिल्यांदा जाऊन होस्टेलच्या टेरेसला कुलूप लावलं,होस्तेलमधल्या सगळ्या दोऱ्या लपवून ठेवल्या.कारण त्या पत्राच उत्तर काय असेल ह्याचा अंदाज मला आतापर्यंत आला होता.पुढचे काही दिवस असेच शांततेत गेले .फूगाने ते पत्र वाचले अशी काही बातमी एकू आली नाही कारण सुश्याच्या रूममधून ना रडण्याचा आवाज वगैरे आला होता ना तो टेरेसकडे जाताना दिसला होता .त्यामुळे जसजसा वेळ जात होता तसं सर्वांची उत्सुकता वाढत चालली होती.शेवटी फूगाने ती टयुटोरीअल परत आणून दिली,तरीसुद्धा काहीच झाल नाही बिचारा सुश्या तर टेन्शनने मरायला आला होता पण तिने ती  टयुटोरीअल आधीच लिहिली असेल अस सांगून त्याची समजूत काढण्यात आली.आणि आता परीक्षा जवळ आल्यामुळे तुझ्या प्रपोजचा कार्यक्रम जरा लांबणीवर टाकू असं सांगून  त्याला अभ्यासाला बसविण्यात आलं.
                       असेच काही दिवस शांततेत गेले.preparation leave सुरु झाली होती.सर्व topper लोक आता वाघ जसा शिकारीवर तुटून पडतो तसे अभ्यासावर तुटून पडले होते.आणि मग थोड्याच दिवसात मी आमच्या नेहमीच्या कट्ट्यावर अभ्यास(?) करीत बसलेलो असताना फुगा तिथे आली.कदाचित सुष्याला शोधत तिथे आली,नक्कीच अभ्य्सात काहीतरी डाउट असेल असं मला वाटल.मला पाहताच ती माझ्याजवळ आली,आणि म्हणाली,
                   "अरे सुश्या कुठाय?"
                   "तो रूमवर अभ्यास करतोय,का? काही काम होत का?"
                   "अरे काही नाही,त्याला हि पत्रिका द्यायची होती "
                   "कसली?"
                   "अरे लग्नपत्रिका,माझं लग्न ठरलंय "

.......

 क्रमश...................         

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१२

इन्जीनियरांच्या लव्हस्टोऱ्या:सुश्याचं प्रेमपत्र(भाग १ )

                               "सुश्या फुगाला प्रपोज करणार"
               हि बातमी संजीवनच्या होस्टेलमध्ये वणव्यासारखी पसरली.सुश्याच्या नेभळटपनाकडे बघून आणि त्याचा पूर्वेतिहास माहित असल्याने मी तिकडे फारसं लक्ष दिलं नाही.पण त्याला भेटून त्याचा रागरंग त्या बातमीवर विश्वास ठेवावाच लागला. 
               कॉलेजच्या शेवटच्या वर्षीतरी ती आपल्याला 'हो' म्हणेल या भोळ्या आशेपोटी हा बहाद्दर हे नसतं धाडस करतोय हे मला कळून चुकल.खरतर आमचा सुश्या आणि फुगा दोघेही कॉलेजमध्ये प्रचंड फेमस! अभ्यासात सतत टोप केल्यामुळे सुश्या आणि आपल्या जरा जास्त नखर्यामुळे फुगा कॉलेजमध्ये प्रचंड फेमस झाले होते. फुगाच हे जगावेगळ  नाव आम्ही पोरांनी पाडलं होत, कारण फस्ट यीअरला चवळीच्या शेंगेप्रमाणे असणारी फुगा जेव्हा मेसचं जेवण जेवून जेवून जेव्हा हळूहळू फुगू लागली तेव्हा कम्परीझनसाठी आम्हाला दुसरा शब्दच सापडला नाही.मेसमध्ये तिला जेवताना बघून जगात २५ कोटी भूकबळी आहेत याची खात्री पटायची,आणि ते का आहेत याचं कारणदेखील समजून यायचं.सुश्याला फुगात काय आवडल हे माहित नव्हत पण या वयात गाढवी पण अप्सरेसारखी दिसते हे समजून आलं होत.
             तर अस हे कपल कॉलेजमधल्या इतर कपल्सपेक्षा जरा वेगळ होत,कारण हे एक सिझनल कपल होत,ह्यांच्या दोस्तीचा सिझन फुगाच्या गरजेवर अवलंबून असायचा.म्हणजे सबमिशन ,प्रोजेक्ट,टयुटोरीअल अशावेळी दोघे हमखास एकत्र दिसायचे.पण जेव्हा या गोष्टी नसतील तेव्हा या दोघांतील अंतर मोजायला कोनात इंस्तृमेंट वापरावं हा यक्षप्रश्न आम्हाला पडत असे.कदाचित प्रेमाच्या भरती ओहोटीचा हा प्रकार असेल म्हणून आम्हीही तिकडे दुर्लक्ष करायचो.तरस हे सिझनल कपल अजून कन्फर्म नव्हत त्याच महत्वाच कारण म्हणजे नेभळट स्वभाव.एरवी तीन तीन तास गप्पा मारणाऱ्या सुष्याला ती तीन अक्षर उच्चारायला तीन वर्षात एकदापण जमल नव्हत.म्हणूनच गेले तीनही valentine day स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून घेणारा सुश्या हा valentine day गाजवेल अशी कुणाचीही अपेक्षा नव्हती.पण आता हि बातमी ऐकून "आज कूच तुफानी होगी " हे मी ताडलं.
            प्रेमाचा प्रक्टिकल अनुभव शून्य असूनही थिअरीत प्रचंड विद्वान असणारे बुद्धीजीवी इन्जीनियर सुश्याच्या रुममध्ये न बोलविता फुकटचा सल्ला द्यायला जमा झाले.अगदी शोलेपासून थ्री इडीयटच्या प्रपोज स्टाइलवर विचार करणे सुरु झाले.पण कॉलेजजवळ कुठेच पाण्याची टाकी नसल्याने आणि त्यातही सुष्याला उंचावर चक्कर येत असल्यामुळे शोलेचा ऑप्शन बाद झाला.थ्री इडीयट प्रमाणे गर्ल्स होस्टेलवर जाण्याचा बेत सुश्याने सांगितला पण  गर्ल्स होस्टेलच्या वोचमनच्या हातात हा सापडला तर याचं काय होईल या काळजीपोट आम्ही त्याचा हा बेत हाणून पाडला.कारण हा वोचमन खली चा दुरून नातेवाईक लागतो असं आमच्या कानावर आलं होत.आणि त्याची अगडबंब शरीराकडे भागून ऐकणाऱ्याला ते पटायचं देखील.
           शेवटी जगन्नाथाने दिलेला प्रेमपत्र लिहिण्याचा सल्ला सर्वांनी उचलून धरला.खरतर हा मार्ग आउटडेटेड असला तरी निर्धोक आहे आणि सुश्यला मार बसण्याची शक्यता फारच कमी असल्याने आम्ही याला मान्यता दिली.प्रेमपत्र कस लिहायचं आणि कस पोचवायच हे प्रश्न आता समोर उभे होते.पहिला प्रश्न इंद्रजीतने लगेच सोडविला आणि गुगल वर love-letter असं टाइप करताच ७०००० रिझल्ट आले,मग सुश्याने टेबलवरील जर्नल पेपर उचलला आणि इमानदार  इन्जीनियरिंग स्तुडंटप्रमाणे कॉपी करायला सुरुवात केली.शेवटी कसाबस त्याचं ते तीन पाणी फर्ड्या इंग्लिश मधील प्रेमपत्र तयार झालं.आणि मग शेवटी दिपकने दिलेला दोघांचाही नाव न टाकण्याचा सुरक्षित सल्ला मान्य करून तो ते पत्र पोचवायला तयार झाला.
क्रमश...................

शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१२

वेदना

                           वेदना हि एक असामान्य शिक्षक असते. (pain is a excellent teacher).हे  वाक्य मी लहानपणी कुठतरी वाचलं होत.  कदाचित वयामुळे असेल किंवा या वाक्याचा अर्थ कळला नाही म्हणून फार काळच ती शिकवण विस्मृतीत गेली होती. 
                           पण आता सगळाच स्पष्ठ समजून येतंय. आणि अनुभवपण येतोय. एक गोष्ट माझ्या छोट्याशा आयुष्यात मला लक्ष्यात आली आहे ती म्हणजे बहुतांश लोकांना वेदनेपासून,दुखांपासून पळून जाणेच सोयीस्कर वाटते. वेदना या नकोश्या वाटतात. त्यांचा    आपल्या आयुष्याशी संबंध येऊ नये म्हणून प्रत्येकजण जपत असतो. ह्या गोष्टींचा तिरस्कार केला जातो.  मी मात्र या गोष्टींकडे जरा वेगळ्या पद्धतीने बघतो. मला नेहमीच वेदनेची गरज वाटते,वेदना हि माझी प्रेरणा आहे.माझ्या आयुष्यात वेदना नसती तर मी आज जो आहे त कधीच नसतो,म्हणून मी नेहमीच तिचा उपकृत असतो.
                         एकदा कॉलेजमध्ये कशाबद्दल तरी तक्रार करत असताना नांगरे सरांनी मला एक गोष्ट सांगितली होती. ''गरुडाची गोष्ट '',ते म्हणाले होते कि गरुडांच आयुष्य हे ८० वर्षाचं असत पण बहुतांश गरुड हि ४०व्या  वर्षांपार्यांतच जगतात. त्याच कारण असत कि ४०व्या  वर्षी त्यांच्या शरीरात अनेक बदल घडून येत असतात. गरुडाची चोच बोथट होत असते,त्यांच्या नख्या वाढतात आणि त्यांचे पंख झाडून जातात.या काही महिन्यांच्या कालावधीत त्यांना कोणताही आहार मिळत नाही. त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. जिवंत  राहण्यासाठी त्यांच्याकडे एकाच अघोरी उपाय असतो,त्यांना दगडावर आपटून आपली चोच तोडून टाकावी लागते, आपले उरलेसुरले पंख घासून काढावे लागतात. या वेदनेतून आणि संघर्षातून जो वाचतो तोच खरया अर्थाने जगण्यास लायक  ठरतो.त्याची वेदना त्याला नव्या आयुष्याची भेट बहाल करते.जेवढ्या जास्त हलापेष्ठ सहन कराल तेवढा जास्त फायदा होईल,  हाच सिद्धांत डार्विनने मांडलाय.
                            आज आजूबाजूला पाहिलं तर या गोष्टीचा लोकांना विसर पडलाय हे लगेच दिसून येईल. जेव्हा मी लोकांना आपल्या मुलांना आयुष्यभर आपल्याच  पदराखाली घेवून बसलेले पाहतो तेव्हा हि जाणीव अधिकच गडद होत जाते.आपण आपल्या मुलांना किती दिवस या सर्वापासून दूर ठेवणार आहोत? कधीतरी त्यांना या सर्वांचा सामना कराव लागणारच हि वस्तुस्थिती हे लोक नाकारताच असतात. आणि म्हणून हि मुल कधीच कणखर बनू शकत नाहीत. कारण त्यांच्या आईवडीलानी त्यांना कधीच ह्या शब्दाचा अर्थ कळू दिलेला नसतो.म्हणून  ज्याप्रमाणे आपली पूर्वजांची  शेपटी  नष्ट  झाली त्याप्रमाणे परिस्थितीशी लढण्याची आपली निसर्गदत्त देणगी आपण हरवून बसू अशी भीती मला नेहमीच वाटते    
माझ तर अस ठाम मत आहे, कि वेदना हि आपली एक जिवाभावाची मैत्रीण असते, ती आपल्या जवळ आयुष्यातील सगळ्यात कठीण आणि दुखद प्रसंगापासून सोबत करीत असते,त्या प्रसंगातून परत उभं राहण्याची प्रेरणा देत असते,ती आपल्या मनात सतत संघर्षाची ज्योत जागृत ठेवत असते.या मार्गावर आपली सोबत करीत असताना ती कधीही ध्येयाचा विसर पडू दात नाही.
                          तिची साथ असेल तरच अशक्य कोटीतील कामे शक्य होऊ शकतात.जगातील मोठमोठ्या लोकांना तिनेच घडविले आहे. म्हणून म्हणतोय तिच्यापासून पळू नका तिला आपली माना  तिच्यापासून प्रेरणा घ्या,ती तुम्हाला साथ देऊन तुमचा अनुभव आणि जीवन समृद्ध करण्यास मदत करेल.
                          तुमच्या आयुष्यात वेदना नसेल तर मात्र तुम्ही सामान्यच राहाल, कारण असामान्य गोष्टी करण्याची गरज तुम्हाला वाटणार नाही.  

शुक्रवार, २७ जुलै, २०१२

निकाल

                          "निकाल लागला" हे दोन शब्द एकले कि जगबुडी झाल्यासारखं वाटत.हातातलं पुस्तक,फुटबॉल आणि असेल तर गर्लफ्रेन्डचा हातही सोडu पावलं कॉम्पुठरकडे धाव घेतात.(माझ्या हाती अशा वेळी नेहमी फक्त पुस्तकच असत ).
                           धडधडत्या हृदयाने आणि थरथरत्या हाताने न धड पासवर्ड आठवतो आणि न धड बटन सापडतात.कसातरी कॉम्पुठर चालू करून unishivaji.ac.in हि अक्षरे टाईप होतात आणि परीक्षा क्रमांक टाकून एनटर केलं कि मग मात्र सुरु होते loading...........loading...........loading.......................अर्ध मिनिट ,फक्त हे अर्ध मिनिट प्रचंड तणावाच असतं,यातलं टेन्शन व्यक्त करण्यापलीकडे असते. एका सेमची मेहनत,अभ्यासासाठी जागविलेल्या रात्री,आई वडिलांच्या अपेक्षा ,कॅम्पस enterview बद्दलच्या आशा हे सर्व डोळ्यापुढे slide शो प्रमाणे सरकत जाते.हृदयाची धडधड इतकी वाढते कि होस्टेलच्या गेटवर उभ्या वोचमन पण एकू जाईल.
                             मग ते रिझल्टच सोनेरी पान लोड होत,आणि मग काहींचा निकाल लागतो आणि काहींचा "निकालच" लागतो.निकाल लागणारे खुश होतात ,ज्यांनी top केलाय ते खुश ,ज्यांना फर्स्ट क्लास मिळालाय ते हि खुश आणि जे काठावर पास झालेत ते टर सगळ्यात जास्त खुश.आपला रिझल्ट पहिला कि मित्रांची आठवण येते,मग इतरांचे  रिझल्ट पहिले जातात. हा  topper आहे,त्याला first class मिळाला,त्याचे दोन विषय राहिले वगैरे.......वगैरे..........वगैरे.............................यातूनच जुन्या नव्या topper लोकांची भांडण ठरलेलीच असतात.मग त्या भांडनाविषयी आणि मार्कांविषयी रात्रभर स्टेटस अपडेट होत राहत. आणि सोबतीला अभिनंदनाचे आणि सांत्वनाचे फोन येताच राहतात.इतक्या दिवसाचं टेन्शन,प्रेशर एका मिनिटात रिलीज होऊन जात. हलक वाटू लागत.
                           दुसरा दिवस सरांना मार्क्स सांगून कौतुक करून घेणे,जुन्या नव्या topper लोकांची भांडण  मिटविणे (actually enjoy करणे )आणि दोन लेक्चर झाल्यावर पळून जाऊन पार्टी करणे यात संपतो.(आम्ही या वेळी पन्हाळ्यावर गेलो होतो ) आणि अशा तर्हेने  रिझल्टचा सहामाही सन साजरा होतो.आणि मग पुढच्या सन चांगला साजरा करण्यासाठी तयारीला लागायचं. खरतर आता पूर्वीसारखे  रिझल्ट आधी सांगून लागत नाही ते एक बर आहे. कारण कुणालाही काही माहित नसताना अचानक जेव्हा  रिझल्ट लागतो तेव्हा जो शॉक बसतो तो एकदम अमेझिंग असतो.आणि तो धक्का पचायच्या आत नवा शॉक बसणार असतो.
                            खरतर आता हे शॉक परत बसणार नाहीत कारण आता परीक्षेशीच णाळ  तुटणार तिथे  रिझल्ट चा दुरान्वयेही संबंध येईल का नाही कुणास ठाऊक. 
तर मग या रिझल्टची नशा आताच एन्जोय करुत..................................... 
by the way,मी पास झालोय बऱ्या मार्कांनी :-)

गुरुवार, २६ जुलै, २०१२

झोंबी

                                परवा लायब्ररीच्या मराठी सेक्शन मध्ये  झोंबी सापडली. कव्हर बघून एखादे आत्मचरित्र वाटले पण वाचायला सुरुवात केल्यावर समजले कि हि तर एका अपूर्व वेदनेची गाथा आहे.                                                                                                                                                                 कालच  "झोंबी" वाचून खाली ठेवली.डोक सुन्न झाल. आज आम्ही किती lucky आहोत.शिक्षण मिळविण्यासाठी कुणी एवढ्या यातना सोसल्या असतील हि कल्पना पण करवीत नाही.शाळेत घवघवीत यश मिळवून पण चाबकाचा मार जर आम्हाला मिळाला असता तर आमच काय झाल असत याची कल्पनापण करावीत नाही. 
                                  आन्दाची शिक्षणासाठीची तळमळ मनात ठासून जाते.त्याची स्वप्ने त्याच्या बापापेक्षा वेगळी असतात.त्याला शिक्षणाची ओढ होती पण त्याला ते मिळत नव्हत,यातूनच त्याची वेदना जन्माला आली, त्या  वेदनेतून त्याने त्याची कविता साकारली,आणि जन्माला आला मराठीतला एक कवी "आनंद यादव "
                                  गरिबी म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल  तर "झोंबी" नक्कीच वाचा आणि आपल्या बापाला शिव्या देवून त्याचा वाइटपनाचा उद्धार करणाऱ्यांनी तर हे पुस्तक नक्कीच वाचावे कारण एखादा बाप किती वाइट असू शकतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर आनंद यादवांनी चितारलेला "दादा"वाचलाच पाहिजे. आडमुठेपनाच सगळ्यात इरसाल उदाहरण म्हणजे आन्दाचा बाप,त्याची एक वेगळीच "philosophy " होती, शिक्षण म्हणजे मुलं वाया घालविण्याची जागा हे त्याच प्रामाणिक मत. दहा बारा पोर होवूनही हे देवाची देणगी असा त्याच मत,मग भले पोर उपाशी राहून मेली तरी याच  त्याला काही सोयरसुतक नाही.      झोबीचा नायक जरी अन्दा असला तरी त्याचा बाप मात्र जास्तच भावला. 
                                 परिस्थितीशी झगडणारा नायक फार वेळा वाचलंय, पण आनंदा फारच जवळचा वाटला 
त्याची झोंबी जरा जास्तच झोंबली .

शुक्रवार, १३ जुलै, २०१२

शेवटच्या वर्षी

                                                        आज परत एक लेक्चर झाल,विषय काय नेहमीचाच ,''शेवटच्या वर्षाला आहात ,करियरची काही तरी काळजी करा नाहीतर आयुष्याची वाट लागेल ''.हे वाक्य शंभरदा एकूण डोके  फिरायची वेळ आली होती  .नाही तसं पाहिलं तर  हा विषय फार गंभीर आहे हे मान्य ,पण कितीवेळा ऐकायचं  हे ?म्हणून ऐकूनही या कानातून एकूण त्या कानातून दरवेळी सोडली.
                                                      एखादी गोष्ट चार वेळा जरी सांगितली तरी कळते आम्हाला पण इथे तर जो तो येतो  आणि टपली मारून जातोय.जणू काही आमच्या  भवितव्याची आम्हाला काही काळजीच नाही.मला हे म्हणायचं नाही कि कुणी आम्हाला काही सांगूच नका ,पण माझं म्हनन एवढच  आहे कि जरा  आमच्पण म्हनन ऐका,खरच आम्ही आमच्या करियरबद्दल सेरियस  नव्हतो ?आज आम्हाला इंजिनियर म्हणजे  काय हे  कळायच्या आधी आम्हाला  इंजिनियरिंगच्य अडमिशानाचे फॉर्म भरावे लागतात,आणि  कसातरी सर्व आणि प्रक्रिया पार करून कोलेजच्या आवारात पोचतो न पोचतो तोच मार्कांच्या रेस मध्ये ओढले जातो,पाच तास कोलेज,दोन तास क्लास,तीन तास सबमिशन,तासभर प्रवास यात दिवस आणि  प्रक्टीकॅल्स,टेस्ट,परीक्षा यात एकामागून एक वर्ष मुठीतल्या वाळूप्रमाणे संपून जातात आणि मग कधी करू करियरचा विचार?.बर आजकाल इथे फक्त मार्क असून भागात नाही, soft स्किल पण पाहिजेत,त्यासाठी इतर activities करा. पण या rat race मधून  वेळ कुणाला आहे.चार वर्ष राबा आणि बाहेर आल्यावर आम्हाला काही किंमतच नाही. 




                                                        थकवलय पार या इंजिनियरिंग.आता शेवटच्या  वर्षी अडमिशनच्या  वेळेची स्वप्न आता बासनात गुंडाललीत,सबमिशसाठी जगलेल्या रात्री निरर्थक वाटतायत.आता जगाच्या नकाशात स्वताच स्थान शोधायचं आहे ,स्वत:च्या हिमतीवर ...............................                
                
                

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
HTML Comment Box is loading comments...