बुधवार, ३० जानेवारी, २०१३

स्वार्थत्याग


 "स्वार्थत्याग" हा गुण महान राष्ट्राच्या नागरिकाच्या अंगी असावा लागतो.

          कधीतरी मी स्वत:ला हा प्रश्न विचारतो कि भारतीय नागरिकांच्या अंगी हा गुण आहे काफार काथ्याकुट केल्यावर मला उत्तर मिळते "नाही",आजूबाजूला पाहिलं तर माझ्या या वाक्यातील सत्यांश आपल्या ध्यानी  येईल.भ्रष्टाचाराविरुद्ध कितीही बोंबाबोंब केली तरी सिग्नलवर १०० रुपयांचा दंड भरण्या ऐवजी  आपण पोलिसाला "साहेब ५० मध्ये अडजस्ट करा कि " म्हणून खुली ऑफर देतोआपण ५० रुपयांच्या फायद्यासाठी व्यवस्था भ्रष्ट करतो मग खरच आपणास भ्रष्टाचाराविरुद्ध बोलण्याचा अधिकार पोचतो का?
          आपल्या इथे एखादा गरीब आणि स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार निवडणूक जिंकल्याची उदाहरणे किती आहेत? अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच उदाहरणे सापडतील.आज जे देशात माजलय त्यानंतरही कॉंग्रेस परत जिंकून येऊ शकते याच  कारण  मते देताना आपण आपली तत्वे,विचार आणि सारासार विचारशक्ती बासनात बांधून ठेवलेली असते.आणि एकदा का मतदान करून बाहेर पडलो कि मग  मोठमोठी तत्वज्ञान सुचू लागतात,

      “देवा पांडुरंगा या देशाला वाचीव बाबा” 

शुक्रवार, ११ जानेवारी, २०१३

क्रांती


                         विस्टन चर्चिल एकदा म्हणाले होते कि "युद्ध फार वाईट असते पण राष्ट्राची मानहानी त्यापेक्षा कितीतरी वाईट असते".भारताच्या दोन निधड्या छातीच्या जवानांची निघृण हत्या होते आणि आपले सरकार त्याचा फक्त निषेध नोंदविते.अशावेळी स्वतंत्र भारताच्या नागरिकांच्या स्वाभिमानाला तडा जातोय हि गोष्ट आपल्या सरकारच्या ध्यानी का येत नाही ? आजकालच्या घटनाकडे पाहिलं तर भारताच्या श्यामळू  कुणाचाच विश्वास राहिला नाही .भारतीय तरुणांना नव्या तगड्या नेतृत्वाची गरज भासत आहे.भारतातील हे नवीन नेतृत्व भारतीय तरूणांच खर नेतृत्व असावं अशी आम्हा तरुणांची अपेक्षा  आहे.राजकीय  पक्ष,त्यांची सत्तापिपासू वृत्ती,   फायदा बघून बदलणारी तत्वे या सर्वांपासून सुटका होण्याची वाट भारतीय तरुण बघत आहे. 
                       भारतातील हि अराजकाची स्थिती पाहून मला एका नाझी जनरलने सांगितलेले वाक्य आठवतेय,"जेव्हा व्यवस्था ढासळू लागेल,जेव्हा सत्ताधारी लोक स्वार्थासाठी राष्ट्राला दावाणीस बांधतील,लोकांचा धर्म,राष्ट्र आणि तत्वान्वरचा विश्वास ढळू लागेल तेव्हा याला विरोध करण्यासाठीविरोध करण्यासाठी जनतेतून एक नेता समोर येईल आणि तो सत्ता हातात घेईल आणि यासाठी जरी त्याला रक्तामासाचा चिखल तुडवावा लागला तरी तो डगमगणार नाही "
                        सरकारने स्वत:ला आणि देशाला पण सावरावे नाहीतर..... हो क्रांती होणारच .पण त्यासाठी रक्तामासाचा चिखल तुडवावा लागू नये एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
HTML Comment Box is loading comments...