सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१२

अर्जुन रणतुंगा व्हर्सेस मन्नान फरास



आमच्या कॉलेजमध्ये  काल अर्जुन रणतुंगा आला होता.तो काल कोल्हापुरात येऊन महालक्ष्मीचे दर्शन घेऊन गेला हि बातमी आजच्या  सकाळ मध्ये वाचली आणि  अर्ध्या  तासातच तो कॉलेजमध्ये येणार हि बातमी समजली.हि बातमी एकूण आख्ख्या कॉलेजमध्ये उत्साहाच वार संचारलं .नुसती धावपळ चालू झाली आमचे अभ्यासू बोयज पण अभ्यास सोडून त्याच्या येण्याची वाट पाहू लागले.तो बारा वाजता येणार हे कळल्यावर मात्र मेक बॉयजची निराशा झाली कारण परवा  ईद होती आणि म्हणून आमच्या मन्नान फरासने आम्हा सर्व मित्रांना त्याच दिवशी बिर्याणीचा पार्टी  द्यायचं  ठरवील होत. आता जर हा कार्यक्रम दीड वाजायच्या आत उरकला नाही तर पुढचा कार्यक्रमाला उशीर होणार हे नक्की होत.
तरीपण आम्ही मोठ्या  श्रद्धेनं   अर्जुन रणतुंगाची वाट बघू लागलो.पण आम्ही हे विसरलो होतो कि शेवटी श्रीलंका भारताच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या जवळ  त्यामुळे आपले गुणधर्म थाडे का होईना जुळणारच.सव्वा बारा झाले,पाहुणे एक वाजला एक वाजला शेवटी दीड वाजले तरी त्याचा काहीच पत्ता नव्हता नव्हता .आमच्या  कावळे ओरडू लागले होते.शेवटी मीच विचार केला कि अर्जुन  रणतुंगा श्रीलंकेचा कप्तान जरी असला आणि  कितीही मोठा  असला तरी तो काय आपल्या फरास आणि त्याच्या  बिर्यानिपेक्षा मोठा नाही.मग आम्ही अर्जुन  रणतुंगा लांबुन नमस्कार केला आणि फरास च्या घराकडे पळालो . अशी हि अर्जुन  रणतुंगा व्हर्सेस मन्नान फरास हि मच फरासनेच जिंकली .मग शेवटी रणतुंगाला  भेटता न आल्यामुळे प्रायश्चित  आम्ही पुसाटी बुरुजाजवळ   
क्रिकेट खेळून व्यक्त केलच.पण एवढ मात्र खर कि आमच्या पाठीमागे तो रणतुंगा आला काय कि गेला काय बिर्यानिपुढे आम्हाला कसलाच सोयरसुतक नव्हत.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
HTML Comment Box is loading comments...