"अलविदा
२०१२"
आणखी
एक वर्ष सरलं .२०१२ संपल पण जग काही बदल नाही यातच सगळा आनंद आहे.कारण या वर्षातील
महागाई ,बलात्कार,अपघात या सर्वांचा जो महापूर आला होता तो पाहून जग नक्की बुडणार अशी
धास्ती कित्येकांना वाटत होती.पण तास काय झाल नाही यातच आनंद.आता २०१३ न आपल्या गर्भात
काय लपविलाय ते त्यालाच माहित,पण आपण त्याच्याकडून चांगल्याच अपेक्षा ठेवू.
बाकी
वर्ष संपताना अनेकांना हिशोब मांडायची सवय असते.या वर्षात काय मिळवील आणि काय
गमावलं याचा .वर्षाचा सुरुवातीला किती संकल्प केले आणि त्यातील किती पूर्ण केले हे
पाहिलं तर लक्षात येत कि आपण प्लान करण्यात पटाईत आहोत पण केलेले प्लान वास्तवात उतरविण्यास
आपण सोयीस्कर रित्या विसरलो आहोत.पण हे लक्षात मात्र येते वर्षाखेरीस.मग आपण मनाशीच
म्हणतो कि आता नाही जमले न मग पुढच्या वर्षी.
प्रत्येक
वर्षी ३१ डिसेंबर चा जल्लोष प्रत्येकासाठी वेगळा असेल पिणारे पितील,खाणारे खातील,प्रत्येकाची
वेगळी तऱ्हा.प्या पण पिउन गाडी चालविण्याचे उपकार पब्लिकवर करू नका हीच विनंती.
आणि
आता या वर्षाला निरोप देताना जमल तर या वर्षी केलेल्या चुका पुढच्या वर्षी होऊ देऊ
नका.